शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतक-यांच्या हक्काच्या मदतीसाठी कायदेशीर लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:17 IST

नैसर्गिक आपत्ती शेती सहाय्यक समितीची स्थापना करून कायदेशीर लढ्याद्वारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे विविध पिकांचे मोठे नुकसान झाले, अशी अधिसूचना शासनाने काढली तरच शेतकरी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरफ) मदत मिळण्यास पात्र ठरतील. मात्र, शासन केवळ घोषणा करत असून, वैधानिक चौकटीत राहून एकही बाब पूर्ण करण्यात तयार नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती शेती सहाय्यक समितीची स्थापना करून कायदेशीर लढ्याद्वारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.लाखे पाटील म्हणाले, की या वर्षी संकटांची मालिका शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. खरिपात वेळेवर लागवड झाल्यानंतर पावसामध्ये पाच ते सहा आठवड्याचा खंड पडला. त्यानंतर परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या वेळीच पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शेतकºयांना जी मदत मिळायला हवी होती. त्या पैकी काहीच मिळाले नाही. शासन केवळ आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ) मदत देण्याची घोषणा करून शेतकºयांची दिशाभूल करत आहे. वास्तविक पाहता राज्यसरकारने बोंडअळी व गारपीट नैसर्गिक आपत्ती मानून, तशी अधिसूचना काढून राज्याच्या एसडीआरएफ निधीतून तातडीची मदत शेतकºयांना द्यायला हवी होती. याबाबत वैधानिक तरतूद आहे. या फंडातून मदत दिल्यानंतरच केंद्र सरकार एनडीआरएफमधून मदत देते. नैसर्गिक आपत्ती जाहीर केली तरच पीकविमा मिळतो. परंतु विमा कंपन्या, सरकार आणि अधिकारी आपत्ती व्यवस्थापनाची कायदेशीर यंत्रणा न उभारता शेतकºयांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व बाबींचा अभ्यास करून नैसर्गिक आपत्तीपासून शेतकºयांना वैधानिक मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील १०२ तालुक्यात महाराष्ट्र राज्य नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कृषीपूरक उद्योग आणि विकास समिती स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील ६४ समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त किती शेतकºयांचे गाव निहाय पंचनामे पूर्ण झाले याच्या याद्या मिळविणे, या आधारे शेतकºयांना, गावांना आपत्तीग्रस्त प्रमाणपत्र मिळवून देणे, केंद्राच्या आपत्ती अनुदान निधीतून शेतकºयांना मदत मिळवून देणे, मार्गदर्शन करणे,शेतकºयांना हक्काचा विमा मिळवून देण्याची कामे वैधानिक चौकटीत राहून करणार असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले.