शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कामासाठी मजुरांचे जि.प. समोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:33 IST

सोमवारी परतूर, मंठा तसेच अन्य तालुक्यातील संतप्त मजुरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर वाढले असून, रोजगाराच्या शोधात शेकडो नागरिक शहराकडे आपला मोर्चा वळवत असल्याची माहिती कामगार नेते अण्णा सावंत यांनी सांगितले. सोमवारी परतूर, मंठा तसेच अन्य तालुक्यातील संतप्त मजुरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या शेतमजूरांना गावातच काम उपलब्ध करून देण्या संदर्भातील नियोजन हे प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव या कामगारांच्या धरणे आंदोलनाने पुढे आले आहे. एकीकडे प्रशासनाकडे या संदर्भात संपर्क केला असता, ते म्हणाले की, आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला सेल्फवरील कामांचे नियोजन करण्याचे सूचना दिल्या आहेत. मात्र एकीकडे जी कामे केली सुरू आहेत, ती कामे जेसीबीने उरकन्यावर कंत्राटदारांचा भर असल्याचा आरोप मजूरांनी केला. त्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे याची चौकशी होणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे ही जिल्हाधिकाऱ्यांनी मजूरांसाठी दिल्यास त्यांना हक्काचा रोजगार मिळू शकेल.मात्र तसे होतांना दिसत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास माव पाटोदा, लिखीत पिंप्री येथे जेसीबीने कामे करण्यार भर दिला जात आहे.यावेळी कामगार नेते मधुकर मोकळे, मारोती खंदारे तसेच अन्य कामगार नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बहुसंख्य मजूजरांनी सहभाग घेता होता. हे उपोषण जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत, तो पर्यंत सुरू राहील अशी माहिती अण्णा सावंत यांनी एका निवेदनाव्दारे कळविली आहे.मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले निवेदनदुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी मजूर युनियन आणि लालबावटाच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे की, परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांतील मजुरांना मनरेगातून कामे द्यावीत, कामाची मागणी करूनही कामे न मिळाल्यास मजुरांना बेरोजगारी भत्ता द्यावा, प्रत्येक गावात दोन कोटी रुपयांच्या सेल्फची कामे मंजूर करावीत, परतूर तालुक्यातील आंबा येथील गाळ काढण्याच्या कामात ग्रामसेवकाची चौकशी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदagitationआंदोलन