शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

बाजार समितीच्या निवडणुकांना मुदतवाढीचा खोतकरांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत असलेल्या जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत मे अखेर संपत होती. ...

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत असलेल्या जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत मे अखेर संपत होती. त्यामुळे देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजपला आणखी वाट पाहावी लागणार आहे, हे आता नवीन निर्णयामुळे स्पष्ट झाले असून, सलग १४ वर्ष सभापतीपद उपभोगण्याचा सन्मान मिळालेल्या माजी मंत्री अर्जुन खोतकरांना हा एकप्रकारे माेठा दिलासाच म्हणावा लागेल. मराठवाड्यात लातूरनंतर जालना बाजार समितीची उलाढाल राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत होते. जालन्यातील भुसार मालाचे मार्केट संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून, येथील व्यवहाराचे वैशिष्ट म्हणजे येथे शेतकऱ्यांना माल खरेदी केल्यावर लगेचच आडत्यांकडून रोखीने पैसे मिळतात. त्यामुळे शेजारील विदर्भासह मराठवाड्यातून येथे माल विक्रीसाठी आणला जातो. जालना बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे जालन्यासह बदनापूर तालुका आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जालना बाजार समितीवर साधारपणे २००७पासून खोतकरांचे वर्चस्व आहे. खोतकरांच्या म्हणजेच शिवसेनेच्या ताब्यात ही बाजार समिती आहे.

सध्या या बाजार समितीत भाजपही शिवसेनेसोबत असून, भाजपचे भास्कर दानवे हे उपसभापती आहेत. या बाजार समितीची मुदत मे अखेर संपत होती. त्यामुळे साधारणपणे जूनमध्ये समितीच्या निवडणुका होतील, असे संकेत होते. परंतु, आता कोरोनाचे कारण देत राज्यातील जवळपास २७७ बाजार समितींच्या निवडणुकीला राज्य सरकारने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ मिळाल्याने जालना बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी कंबर कसून बसलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा मात्र हिरमोड न झाल्यास नवल. खोतकरांनी जालना बाजार समितीचा कारभार करताना काही मोजके मुद्दे बाजूला ठेवले तर अनेक मुद्द्यांवर लक्षणीय कामे करून समितीच्या वैभवात भर घातली आहे.

त्यांनी बाजार समितीच्या श्याम लॉजसमोरील जागेत व्यापारी संकुल उभारले आहे. तसेच औषध बाजार आणि समोरील बाजूलाही दुकाने काढून बाजार समितीच्या उत्पन्नात भर घातली आहे. खोतकरांच्या या निर्णयावर त्यांचे राजकीय विरोधक आमदार कैलास गोरंट्याल हे समाधानी नसून, श्याम लॉजसमोरील जागा ही जालना पालिकेची असल्याचा दावा त्यांनी करून याला न्यायालयात आव्हानही दिले आहे. परंतु, हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात येते. याच व्यापारी संकुलाच्या मुद्द्यावरून २०१६मध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतले होते. परंतु, नंतर सर्व काही जैसे थे झाले आहे. तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनीही तूर खरेदीच्या मुद्द्यावरून त्यावेळी खोतकरांना लक्ष्य केले होते, हे विशेष.

आपण चांगल्या कामांनाच दिले प्राधान्य

जालना बाजार समिती ही एक अत्यंत महत्त्वाची समिती आहे. जालन्यातील व्यापारी, शेतकरी मोठ्या विश्वासाने येथे व्यवहार करतात. त्यांच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ दिला नाही. परंतु, राजकीय इर्षेतून काहीजण आपल्यावर आरोप करतात. परंतु, अद्यापपर्यंत विरोधकांनी केलेला एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. केवळ राजकीय स्वार्थ म्हणून केलेल्या आरोपांनी विचलित न होता अधिकाधिक चांगले काम करून जालना बाजार समितीचा नावलौकिकच आपण वाढवला आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळाली नसती, तरीदेखील आमच्याच पक्षाच्या ताब्यात ही समिती आली असती आणि भविष्यातही येईलच.

- अर्जुन खोतकर, सभापती, बाजार समिती, जालना.