शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:08 IST

बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी सुरूवात केल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. या हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत. यातील नांदेडच्या एका मिश्र खत उत्पादक कंपन्या नमुन्यांमध्ये निकष असलेले घटक आढळून न आल्याने त्या खतांची विक्री थांबवली आहे.जालना जिल्ह्यात खरिपाचे एकणू पाच लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकरी पेरणीच्या कामांना गती आली आहे.अनेक शेतक-यांनी नांगरणी यापूर्वीच केली होती. आता लहान-सहान गवताच्या काड्यांचा भुगा करण्यासाठी ट्रॅक्टरव्दारे रोटावेटर मारण्याच्या कामांना वेग आला असून, शेती कामांना ट्रॅक्टर मिळणे अवघड झाले आहे.बांध बंदिस्ती करण्यासाठी जेसीबीची कमतरता देखील जाणवत आहे. दुसरीकडे दुष्काळात अनेक शेतक-यांनी आपले पशुधन हे कवडीमोल दराने विक्री केले. त्याचाही परिणाम शेतीवर होत आहे.आज अनेकजण एकमेकांना बैलजोडी देऊन मदत करत आहेत. एक आठवडा एकाच्या तर दुस-या आठवड्यात दुस-या शेतक-यांडे पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. जालना जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या बियाणांचे संकलन करून त्याचे नमुने हे औरंगाबाद तसेच नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, नांदेड येथील एका मिश्र खतांच्या निर्मितीच्या नमुन्यांमध्ये जे घटक खतांमध्ये असायला हवे होते. ते दिसून न आल्याने त्यांच्या खतांच्या साठ्याला विक्री बंदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणनियंक एस.डी. गरांडे यांनी दिली.शेतक-यांनी बॅच जपून ठेवण्याचे आवाहनआज जरी पेरणी झालेली नसली तरी, चांगल्या पाऊस पडल्यावर येत्या १५ दिवसात पेरणीला वेग येणार आहे. ही पेरणी करताना शेतक-यांनी ज्या कंपनीचे बियाणे आणून खरेदी केली आहे, त्यावेळी त्या कंपनीचे नाव, त्या बियाणे पिशवीवर असलेला बॅच क्रमांक हा सांभाळून ठेवावा. जेणेकरून पेरणी केल्यावर जर त्या बियाणांची उगवण झाली नाही, त्यावेळी हा बॅच महत्वाची भूमिका निभावू शकतो. या बॅचमुळे नंतर संबंधित कंपनीविरूध्द कारवाई करण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीGovernmentसरकार