शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

रेल्वे ट्रॅकवर नजर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:29 IST

सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही वर्षांमध्ये मनमाड ते हैदराबाद या मार्गावरील रेल्वे वाहतूकीत मोठी वाढ झाली आहे. हा एकेरी मार्ग असल्याने या रेल्वे रूळांवर जास्त भार पडतो. त्यामुळे सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले.शनिवारी त्यांनी जालना, परतूर या रेल्वे स्थानकास भेटी दिल्या. यावेळी राभा यांनी रेल्वेस्थानक परिसरातील स्वच्छतेसह अन्य विकास कामांची पाहणी केली. स्वच्छतेच्या संदर्भात सुधारणा झाल्याचे समाधान त्यांनी यावेळी बोलून दाखवले.यावेळी त्यांच्या समवेत मंडल वाणिज्य प्रबंधक नेहा रत्नाकर, बी. के. पांडे आदींची उपस्थिती होती.परतूर येथील रेल्वेस्थानकाचीही राभा यांनी पाहणी केली. त्यावेळी तेथील व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सचखंड रेल्वेला परतूर येथे थांबा देण्याची मागणी केली. तसेच रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम गतीने करण्याची सूचना करून यामुळे येथील वाहतूक कोंडी थांबेल, असे सांगितले. यावेळी मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, प्रकाश सोळंके, रहीम कुरेशी यांच्यासह प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.दरम्यान, बदनापूर रेल्वे स्थानकावरही व्यवस्थापकांनी थांबून पाहणी केली. यावेळी गजानन गिते, विष्णू शिंदे, शिवाजी चाळगे, संजय ज-हाड, अरूण राजपूत, कैलास खेंडके, केदारनाथ ढाकणे, अमोल दाभाडे, सुदर्शन शिंदे आदींनी व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले. बदनापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली.विभागीय व्यवस्थापक राभा यांनी एक ते दीड तास जालन्यात थांबून अधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे गेटजवळ उभारण्यात येणाºया भुयारी मार्गासंदर्भात त्यांना विचारले असता, या मार्गाला अद्याप महसूल विभागाकडून परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेTravelप्रवास