शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

रेल्वे ट्रॅकवर नजर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:29 IST

सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही वर्षांमध्ये मनमाड ते हैदराबाद या मार्गावरील रेल्वे वाहतूकीत मोठी वाढ झाली आहे. हा एकेरी मार्ग असल्याने या रेल्वे रूळांवर जास्त भार पडतो. त्यामुळे सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले.शनिवारी त्यांनी जालना, परतूर या रेल्वे स्थानकास भेटी दिल्या. यावेळी राभा यांनी रेल्वेस्थानक परिसरातील स्वच्छतेसह अन्य विकास कामांची पाहणी केली. स्वच्छतेच्या संदर्भात सुधारणा झाल्याचे समाधान त्यांनी यावेळी बोलून दाखवले.यावेळी त्यांच्या समवेत मंडल वाणिज्य प्रबंधक नेहा रत्नाकर, बी. के. पांडे आदींची उपस्थिती होती.परतूर येथील रेल्वेस्थानकाचीही राभा यांनी पाहणी केली. त्यावेळी तेथील व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सचखंड रेल्वेला परतूर येथे थांबा देण्याची मागणी केली. तसेच रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम गतीने करण्याची सूचना करून यामुळे येथील वाहतूक कोंडी थांबेल, असे सांगितले. यावेळी मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, प्रकाश सोळंके, रहीम कुरेशी यांच्यासह प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.दरम्यान, बदनापूर रेल्वे स्थानकावरही व्यवस्थापकांनी थांबून पाहणी केली. यावेळी गजानन गिते, विष्णू शिंदे, शिवाजी चाळगे, संजय ज-हाड, अरूण राजपूत, कैलास खेंडके, केदारनाथ ढाकणे, अमोल दाभाडे, सुदर्शन शिंदे आदींनी व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले. बदनापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली.विभागीय व्यवस्थापक राभा यांनी एक ते दीड तास जालन्यात थांबून अधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे गेटजवळ उभारण्यात येणाºया भुयारी मार्गासंदर्भात त्यांना विचारले असता, या मार्गाला अद्याप महसूल विभागाकडून परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेTravelप्रवास