शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

११ जणांवर २८ दिवस राहणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:21 IST

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीने जालना जिल्ह्यातील ३२ पैकी १९ प्रवासी परदेशातच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीने जालना जिल्ह्यातील ३२ पैकी १९ प्रवासी परदेशातच आहेत. परदेशातून आलेल्या ११ जणांच्या घरी प्रशासनाने भेटी दिल्या आहेत. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर २८ दिवस प्रशासन नजर ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातही हा विषाणू चोर पावलांनी दाखल झाला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरसच्या बचावासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनानेही खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे. तसेच विविध पथकांमार्फत बाहेरील राज्य व परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी परदेशात गेलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांकडून मागविली होती.यात ३२ जण परदेशात असल्याचे समोर आले. ३२ जणांची तपासणी केली असता १९ जण परदेशात असून, ११ जण जिल्ह्यात परतले आहे.या ११ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर घरीच नजर ठेवली जात आहे. उवर्रित दोघांपैकी एकाला डिर्चाज मिळाला आहेत, तर एक धुळ््यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात चाळीस जणांचे विलगीकरण केले असल्याचे सांगण्यात आले.ँपुणे: मुंबईच्या प्रवाशांची तपासणीपुणे व मुंबई येथे कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुणे व मुंबई येथे नोकरीसाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक परत येत आहे. या नागरिकांची जालना-औरंगाबाद रोडवरील वरूडी येथे तपासणी करण्यात येत आहे.येथे आरटीओ व आरोग्य विभागाचे पथक प्रवाशांची तपासणी करीत आहे. मागील चार दिवसांपासून ही तपासणी सुरू असून, गुरूवारी या पथकाने ४० गाड्यांमधील ६५० प्रवाशांची तपासणी केली आहे.जिल्ह्यातील ३२ पैकी १९ जण हे परदेशात आहे. त्यातील ११ जणांची पाहणी करण्यात आली असून, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. इतर दोघांपैकी एकास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एक जण धुळ््यात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य