शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जिजाऊंच्या संस्काराची आजच्या काळाला गरज- घोगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST

जालना : स्त्रीला निर्भयपणे जगात वावरायचे असेल, तिला आपले अस्तित्व सिद्ध करायचे असेल, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर ...

जालना : स्त्रीला निर्भयपणे जगात वावरायचे असेल, तिला आपले अस्तित्व सिद्ध करायचे असेल, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि विचार आत्मसात करावे लागतील. जो समाज इतिहासाचे स्मरण ठेवतो, तोच इतिहास घडवतो, असे प्रतिपादन शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी घनसावंगी तालुक्यातील दाई अंतरवाली येथे संभाजी ब्रिगेड जालना यांच्या वतीने नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक सुदर्शन तारक, तालुकाध्यक्ष कारभारी सपाटे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष डॉ. सचिन घुगे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उढाण, जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, संतोष जेधे, राधेशाम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना घोगरे म्हणाले की, सध्याचा युवक हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्यातच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे युवक आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे युवकांनी व्यसनाच्या आहारी न जात आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तर सुदर्शन तारक यांनी पक्षाची चाकरी केल्यापेक्षा स्वताच्या कष्टाची भाकरी कमवायचा विचार करा, असे मत व्यक्त केले.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विकास काळे, केशव आर्दड, गायक किशोर दिवटे, योगेश गायके, व्यावसायिक अविनाश भुतेकर, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, सरपंच बाळासाहेब बरसाले, भगवान यादव, विनोद बरसाले, गजानन काळे, प्रदीप गंधाखे, पांडुरंग काळे, नितीन बरसाले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उढाण यांनी केले.