शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जामवाडीत हेक्टरी दीड कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:47 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. गुंडेवाडी, तांदूळवाडी येथील जमिनीचे दरही वाढले आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी ५१० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी ४४० हेक्टर खाजगी जमीन असून उर्वरीत शासकीय जमीन आहे. आतापर्यंत सुमारे साडेतीनशे हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, जालना तालुक्यातील आंबेडकरवाडी, निधोना, गुंडेवाडी, तांदूळवाडी व जामवाडी या पाच गावांमधील शेतक-यांनी कमी मोबदला मिळत असल्याचे सांगत जमीन संपादनास तीव्र विरोध केला होता. आंबेडकरवाडी येथील शेतक-यांनी समृद्धी महामार्गात जाणा-या जमिनीची संयुक्त मोजणीही बंद पाडली होती.पाच गावे शहरालगत असल्याने येथील जमिनीला प्रति चौरस मीटरचा दर द्यावा, असे शेतक-यांची मागणी होती. त्यामुळे येथील शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत करून दिले नव्हते. तसेच या गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करून नव्याने मोबदला निश्चित करण्याची मागणी केली होती. याबाबत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत रस्ते विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनातील अधिका-यांची मंत्रालयात वरिष्ठ स्तरावर बैठकही झाली होती. त्यानंतर जिल्हास्तरीय मोबदला निश्चित समितीने या गावांमधील जमिनीच्या दराचे फेरमूल्यांकन करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील आठवड्यात दर निश्चित समितीची बैठक झाली. यामध्ये पाचही गावांमधील बागायती, हंगामी बागायती व जिरायती जमिनीच्या दरांचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी येथील बागायती जमिनीला एकरी सरासरी ६० लाख रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हंगामी बागायती जमिनीला एकरी ४५ तर जिरायती जमिनीला एकरी ३० लाख रुपये दर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात काही प्रमाणात गटनिहाय तफावत असून, निधोना परिसरात औद्योगिक वसाहतीचा भाग असणा-या जमिनीला प्रति चौरस मीटरप्रमाणे मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.इंटरचेंज पॉइंट स्थलांतर : जामवाडी, गुंडेवाडी, तांदूळवाडीच्या शेतक-यांचा विरोधजिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी, तांदूळवाडी शिवारात इंटरचेंज पाइंट (चढ-उतारस्थळ) प्रस्तावित तशी अधिसूचना या पूर्वी काढण्यात आली आहे. हा इंटरचेंज पॉइंट शेतकºयांचा फायद्याचा असून, शेतकºयांची जमीन देण्यास सहमीत आहे. मात्र, काही उद्योजक इंटरचेज पॉइंट निधोना, खादगाव शिवारात हलविण्यासाठी प्रयत्नशील असून, तशा हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत. निधोना शिवारातील जमिनीचे दर सरासरी ८० ते ९० लाख रुपये एकर आहे. तुलनेत गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील दर कमी आहे. खादगाव शिवारात इंटरचेंज पॉइंट झाल्यास मोबदला देताना शासनाचे नुकसानच होणार आहे. इंटरचेंज पॉइंटचे स्थलांतर झाल्यास त्यास जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी येथील शेतकरी तीव्र विरोध करतील, असे समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत वाढेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रhighwayमहामार्ग