शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जामवाडीत हेक्टरी दीड कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:47 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. गुंडेवाडी, तांदूळवाडी येथील जमिनीचे दरही वाढले आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी ५१० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी ४४० हेक्टर खाजगी जमीन असून उर्वरीत शासकीय जमीन आहे. आतापर्यंत सुमारे साडेतीनशे हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, जालना तालुक्यातील आंबेडकरवाडी, निधोना, गुंडेवाडी, तांदूळवाडी व जामवाडी या पाच गावांमधील शेतक-यांनी कमी मोबदला मिळत असल्याचे सांगत जमीन संपादनास तीव्र विरोध केला होता. आंबेडकरवाडी येथील शेतक-यांनी समृद्धी महामार्गात जाणा-या जमिनीची संयुक्त मोजणीही बंद पाडली होती.पाच गावे शहरालगत असल्याने येथील जमिनीला प्रति चौरस मीटरचा दर द्यावा, असे शेतक-यांची मागणी होती. त्यामुळे येथील शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत करून दिले नव्हते. तसेच या गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करून नव्याने मोबदला निश्चित करण्याची मागणी केली होती. याबाबत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत रस्ते विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनातील अधिका-यांची मंत्रालयात वरिष्ठ स्तरावर बैठकही झाली होती. त्यानंतर जिल्हास्तरीय मोबदला निश्चित समितीने या गावांमधील जमिनीच्या दराचे फेरमूल्यांकन करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील आठवड्यात दर निश्चित समितीची बैठक झाली. यामध्ये पाचही गावांमधील बागायती, हंगामी बागायती व जिरायती जमिनीच्या दरांचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी येथील बागायती जमिनीला एकरी सरासरी ६० लाख रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हंगामी बागायती जमिनीला एकरी ४५ तर जिरायती जमिनीला एकरी ३० लाख रुपये दर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात काही प्रमाणात गटनिहाय तफावत असून, निधोना परिसरात औद्योगिक वसाहतीचा भाग असणा-या जमिनीला प्रति चौरस मीटरप्रमाणे मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.इंटरचेंज पॉइंट स्थलांतर : जामवाडी, गुंडेवाडी, तांदूळवाडीच्या शेतक-यांचा विरोधजिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी, तांदूळवाडी शिवारात इंटरचेंज पाइंट (चढ-उतारस्थळ) प्रस्तावित तशी अधिसूचना या पूर्वी काढण्यात आली आहे. हा इंटरचेंज पॉइंट शेतकºयांचा फायद्याचा असून, शेतकºयांची जमीन देण्यास सहमीत आहे. मात्र, काही उद्योजक इंटरचेज पॉइंट निधोना, खादगाव शिवारात हलविण्यासाठी प्रयत्नशील असून, तशा हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत. निधोना शिवारातील जमिनीचे दर सरासरी ८० ते ९० लाख रुपये एकर आहे. तुलनेत गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील दर कमी आहे. खादगाव शिवारात इंटरचेंज पॉइंट झाल्यास मोबदला देताना शासनाचे नुकसानच होणार आहे. इंटरचेंज पॉइंटचे स्थलांतर झाल्यास त्यास जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी येथील शेतकरी तीव्र विरोध करतील, असे समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत वाढेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रhighwayमहामार्ग