शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जालना-पैठण जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:15 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.गेल्या दोन दिवसांपासून पैठण ते पाचोड तसेच पाचोड ते अंबड या मार्गावरील जवळपास पाच ते सात व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मध्यंतरी जालना पालिकेने पुढाकार घेऊन पैठण ते पाचोड आणि पाचोड ते अंबड या दरम्यानच्या जवळपास १८ शेतकºयांवर पाणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तसेच व्हॉल्व्हला गळती लागून नये म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरून अद्ययावत व्हॉल्व्ह बसविण्यात येणार होते. त्यासाठी जालना पालिकेने विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असे असताना अद्यापही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आहे.दरम्यान, जालना शहराला सध्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या घाणेवाडी तलावात मार्च महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे आगामी काळात जालनेकरांना सर्वस्वी जायकवाडीतून येणाºया पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पाणीचोरी : पथकाची कारवाईपैठण येथील जायकवाडी धरणातून जालन्याला पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रूपये खर्च करून २०१२ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. या योजनेतूनही जुन्या शहागड योजनेप्रमाणेच पाणीचोरीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या अचानक तपासणीत धक्कादायक बाबी उघडकीस आली होती.जायकवाडी धरणातून जालन्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला भगदाड पाडून तसेच व्हॉल्व्हला छिद्र पाडून त्यातून शेतकरी पाणी चोरी करत होते. या शेतक-यांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण