शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जालना-पैठण जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:15 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.गेल्या दोन दिवसांपासून पैठण ते पाचोड तसेच पाचोड ते अंबड या मार्गावरील जवळपास पाच ते सात व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मध्यंतरी जालना पालिकेने पुढाकार घेऊन पैठण ते पाचोड आणि पाचोड ते अंबड या दरम्यानच्या जवळपास १८ शेतकºयांवर पाणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तसेच व्हॉल्व्हला गळती लागून नये म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरून अद्ययावत व्हॉल्व्ह बसविण्यात येणार होते. त्यासाठी जालना पालिकेने विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असे असताना अद्यापही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आहे.दरम्यान, जालना शहराला सध्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या घाणेवाडी तलावात मार्च महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे आगामी काळात जालनेकरांना सर्वस्वी जायकवाडीतून येणाºया पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पाणीचोरी : पथकाची कारवाईपैठण येथील जायकवाडी धरणातून जालन्याला पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रूपये खर्च करून २०१२ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. या योजनेतूनही जुन्या शहागड योजनेप्रमाणेच पाणीचोरीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या अचानक तपासणीत धक्कादायक बाबी उघडकीस आली होती.जायकवाडी धरणातून जालन्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला भगदाड पाडून तसेच व्हॉल्व्हला छिद्र पाडून त्यातून शेतकरी पाणी चोरी करत होते. या शेतक-यांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण