शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जालना बाजारपेठ समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

जालना : बाजारपेठेत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.* मात्र ग्राहकी नसल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. ...

जालना : बाजारपेठेत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.* मात्र ग्राहकी नसल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. दररोज लागणाऱ्या २२ अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर सरकारची बारीक नजर आहे.* त्यामुळे या वस्तुमालांमध्ये जास्त तेजी-मंदीची शक्यता नाही. आयात तसेच खाद्यतेलाशी संबंधित व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ग्राहक सचिवांनी सोमवारी बोलावली आहे.* या बैठकीत ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.*

सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केंद्र सरकारने २२ जीवनावश्यक वस्तू, विशेषत: सर्व प्रकारच्या डाळी, तेल, तेलबिया, अन्न, दूध आदींच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कोरोना साथीच्या काळात सामान्य लोकांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणाऱ्या पुरेशा वस्तू वाजवी दरात मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मूग, उडीद आणि तुरीचा समावेश मोफत आयातीच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

सध्या उन्हाळी मुगाची आवक दररोज २५ पोती इतकी असून भाव ५५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सरत्या आठवड्यात उडदाची आवकच झाली नसून भाव ३५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज ३०० पोती इतकी असून भाव ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज ६०० पोती इतकी असून भाव ४७०० ते ४८७५ रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोती इतकी असून भाव ६९०० ते ७३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. हरभरा डाळीचे दर ६१०० ते ६५००, तूरडाळ ९००० ते १००००, मूगडाळ ९००० ते १००००, मसूरडाळ ७००० ते ८५०० आणि उडीद डाळीचे दर ९००० ते १०००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

ग्राहक विभागाच्या सचिवांनी सोमवार २४ मे रोजी आयात करणारे व्यापारी तसेच खाद्य तेलाशी संबंधित सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांची बैठक बोलावली आहे. खाद्य तेलांच्या किमती नियंत्रणात कशा आणता येतील या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असून भारताला तेल उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर कसे बनवता येईल या विषयावरदेखील चर्चा होणार आहे. तेल उत्पादनाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाल्यास देशाची मोठी आर्थिक बचत होईल, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल व युवकांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळेल असा सरकारचा विचार आहे.

पामतेलाचे भाव १४५००, सूर्यफूल तेल १९०००, सरकी तेल १६००० आणि सोयाबीन तेलाचे दर १५८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

राज्यात २५ लाख टन साखरेपासून इथेनाॅल बनविण्याच्या हालचाली सुरू असून यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे. केंद्राची परवानगी मिळताच साखरेपासून इथेनाॅलची निर्मिती सुरू होईल. केंद्रीय परिवहनमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरीचे संकेत दिले आहेत. या प्रस्तावानुसार केंद्र सरकार हे इथेनाॅल ६२.२५ रुपये या दराने खरेदी करेल. यामुळे खुल्या बाजारात साखरेची विक्री कमी होईल आणि कारखानदारांना चांगले दर मिळतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.