शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जालना जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:41 IST

जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाचा पारा वाढू लागल्याने सर्वत्र तप्त वातावरण आहे. याचा मोठा फटका शेती कामालाही बसल्याचे दिसून आले. जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे. यामुळे एकूणच जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर कडक ऊन पडत असल्याने प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. बहुतांश उमेदवार आणि त्यांचे समर्थक हे सायंकाळी चार नंतर आणि सकाळी ११ च्या आत प्रचार उरकून घेत असल्याचे चित्र आहे. प्रचारा सोबतच दररोज गर्दीने फुलणारने रस्ते दुपारी एक ते पाच यावेळेत ओस पडलेले आहेत. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकजण घराच्या बाहेर न पडणेच पसंस करत असल्याचे दिसून आले.सध्या जे काही नागरिक त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडत आहेत, ते सर्वजण पांढरा गमछा बांधून आणि डोळ्यांना गॉगल्स घालूनच बाहेर फिरताना दिसत आहेत. पांढरे कापड वापरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. जालन्यात पांढरे कापड घालणे म्हणजे जास्तीत- जास्त तीन तासात ते धुळीने माखलेले असते. त्यामुळे पांढरे कपडे हे जालन्यात ज्यांच्याकडे प्राधान्याने चारचाकी गाडी आहे, तेच जास्त वापरत असल्याचे दिसून आले.अनेक रस्त्यावर तर आता पूर्वीप्रमाणे गडद सावली देणारे झाडे देखील नामशेष झाले आहेत. सावली शोधूनही मिळत नसल्याचे वास्तव आहे.ऐन कडक उन्हाळ्यात जालनेकरांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. एकूणच वाढत्या उन्हामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, द्राक्ष, कैरी, टरबूज, खरबूज यांना मोठी मागणी असून, अननसही बाजारात दाखल झाले आहेत.दक्षता घ्यावीघराबाहेर पडताना पांढरा रूमाल बांधूनच बाहेर पडावे.डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्सचा वापर करावा.सुती व सैलदार कपडे वापरावे. जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.तहान नसतानाही जास्तीचे पाणी प्यावे.दुपारी १२ ते ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.कृत्रिम थंडपेयांऐवजी दही, लिंबू शरबत, ताक, उसाचा रस, कैरीचे पन्हे आहारात नित्य घ्यावे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानHealthआरोग्य