शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

...तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:20 AM

राजेश भिसे। लोकमत न्यूज नेटवर्क विघटन न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचण्यासह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग ...

राजेश भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कविघटन न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचण्यासह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यास हा घटकही तेवढाच जबाबदार असून, प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा लढा मंत्रालयापासून सुरू झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सकारात्मक पावले उचलली असली, तरी जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासह जनावरांचेही आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल.आजकाल सर्वत्र कुठलीही वस्तू वापरण्यासाठी म्हणा वा तिच्या वाहतुकीसाठी सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे. प्लास्टिक वेस्टमुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वीच पर्यावरण तज्ज्ञांनी प्लास्टिक वापराबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र, याकडे कुणी गांभीर्याने पाहिले नाही. म्हणूनच ही समस्या आज अतिशय गंभीर बनली आहे. प्लास्टिक कचºयासह ई-कचराही सर्वांसाठीच डोकेदु:खी ठरत आहे. प्लास्टिकच्या अनेक वस्तू मानवी आरोग्याला घातक ठरत आहेत. पण त्याच्या जनजागृतीकडे फारसे कुणाचे लक्ष नसल्याने प्लास्टिकचा वापर हा अव्याहतपणे सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात पाण्याच्या बॉटल्सवर बंदी घातली. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा हा नारा मंत्रालयापासून सुरु झाला असून, तो संपूर्ण महाराष्ट्रात नेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तुच्या पॅकिंगसाठी आज प्लास्टिकचा बिनबोभाटपणे वापर होत आहे. तो मानवी आरोग्यास धोकादायक आहे. पण शासकीय यंत्रणांचे याकडे फारसे लक्ष नसल्याने पर्यावरणासह मानवी जिवन धोक्यात आले आहे.जालना शहर आणि जिल्ह्याचा विचार करता पर्यावरण प्रदूषण निर्माण करण्यात पाणी बॉटल्स असो वा पाणी पाऊच हे घटक धोकादायक ठरत आहेत. आजघडीला शहरात पाणीपाऊच तयार करणाºया किमान पाच ते सहा कंपन्या आहेत. कुठल्याही हॉटेलमध्ये चहासाठी ग्राहक आला तरी पिण्याच्या पाण्याचे पाऊच समोर ठेवले जाते. ९० टक्के आजारांचे मूळ अशुद्ध पाणी असल्याने नागरिकही धोका पत्करत नाहीत. म्हणूनच पाण्याचा व्यवसाय दिवसेंदिवस कोटींची उड्डाणे घेत आहे. शहरात कुठेही फेरफेटका मारला तर पाण्याचे रिकामे पाऊच रस्त्याच्या कडेला अस्तावस्तपणे पडलेले आढळून येतात. कालांतराने गायी वा इतर जनावरे हे पाऊच खातात आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मैत्र मांदियाळी यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत प्लास्टिकमुक्त जालना शहरासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांमध्येही पर्यावरण बचावासाठी सकारात्मक भूमिका नसल्याने सध्या तरी याला यश येताना दिसून येत नाही.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा संकल्प केला तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होऊ शकेल. अन्यथा एक दिवस मानवी आरोग्यही धोक्यात येऊन नवनवीन आजारांना निमंत्रण मिळणार आहे. म्हणूनच सावध ऐका पुढल्या हाका....असे म्हटले तर वावगे ठरु नये.