शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:42 IST

शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत १०७ सौरपंपांची जोडणी करण्यात आली आहे.प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असते. आणि त्यासाठी कृषीपंपाना शाश्वत वीजपुरवठा मिळणेही गरजेचे आहे. ही बाब हेरुन राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा तसेच वीजबिलापासून शेतक-यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरु केली आहे. या योजनेला मराठवाड्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.यात अर्ज करण्यापासून ते सौरपंप जोडणीतही जालना जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जालना जिल्ह्यातील २७ हजार ७५६ शेतक-यांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये अनूसुचित जाती प्रवर्गातून १६६२ एसटी प्रवर्गातून १६७, खुल्यामधून ८ हजार ६०० शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ७४७ शेतक-यांना कोटेशन वाटप केले आहे. तर ५ हजार २८० शेतक-यांनी सौरपंपासाठी पैसे भरले आहेत. अर्जाची छाननी करुन आतापर्यंत १०७ शेतक-यांना कृषीसौरपंपाची जोडणी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून जालना जिल्ह्याने सौरपंप जोडणीत अव्वल आहे. एक वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जाईल.एजन्सीकडून जोडणीस होतोय विलंबया योजनेत अर्ज केलेल्या शेतक-यांना सौरपंप पॅनल, विद्युत मोटरीसह इतर साहित्य खरेदीसाठी महावितरणे राज्यभर एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून शेतक-यांना साहित्याची खरेदी करावी लागते. मात्र अनेक शेतक-यांनी संबंधित एजन्सीकडे पैशाचा भरणा केलेला असतांना साहित्य वाटपात एजन्सीकडून विलंब होत असल्याचे शेतक-यातून ओरड होत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना