शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:42 IST

शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत १०७ सौरपंपांची जोडणी करण्यात आली आहे.प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असते. आणि त्यासाठी कृषीपंपाना शाश्वत वीजपुरवठा मिळणेही गरजेचे आहे. ही बाब हेरुन राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा तसेच वीजबिलापासून शेतक-यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरु केली आहे. या योजनेला मराठवाड्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.यात अर्ज करण्यापासून ते सौरपंप जोडणीतही जालना जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जालना जिल्ह्यातील २७ हजार ७५६ शेतक-यांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये अनूसुचित जाती प्रवर्गातून १६६२ एसटी प्रवर्गातून १६७, खुल्यामधून ८ हजार ६०० शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ७४७ शेतक-यांना कोटेशन वाटप केले आहे. तर ५ हजार २८० शेतक-यांनी सौरपंपासाठी पैसे भरले आहेत. अर्जाची छाननी करुन आतापर्यंत १०७ शेतक-यांना कृषीसौरपंपाची जोडणी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून जालना जिल्ह्याने सौरपंप जोडणीत अव्वल आहे. एक वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जाईल.एजन्सीकडून जोडणीस होतोय विलंबया योजनेत अर्ज केलेल्या शेतक-यांना सौरपंप पॅनल, विद्युत मोटरीसह इतर साहित्य खरेदीसाठी महावितरणे राज्यभर एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून शेतक-यांना साहित्याची खरेदी करावी लागते. मात्र अनेक शेतक-यांनी संबंधित एजन्सीकडे पैशाचा भरणा केलेला असतांना साहित्य वाटपात एजन्सीकडून विलंब होत असल्याचे शेतक-यातून ओरड होत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना