शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात वर्षभरात २११ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:50 IST

जिल्हाभरात २०१८ ते २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात २०१८ ते २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असली तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात आजही कुपोषण, विविध आजार, अज्ञान, जुन्या परंपरेमुळे आधुनिक उपचार घेण्यासाठी अनेक महिला पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक विवाहित महिला गरोदर राहण्याच्या काळापासून काळजी घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे उपजत, नवजात अर्भक तसेच 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या अवस्थेमुळे अनेक वेळा मातांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जालना जिल्ह्यात २०१८ -१९ या वर्षात 0 ते ५ वर्षे वयोगटातील २११ बालकांचा मृत्यू झाला आहे. सदर बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून, शहरी भागासह ग्रामीण भागात या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. बालमृत्यूंची संख्या पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात काळजी घेणे गरजेचे आहे.२५६ उपजत मृत्यूजिल्ह्यात २५६ उपजत मृत्यू झाले आहेत. कुपोषणामुळे आईच्या पोटात असलेल्या बाळाचे पोषण होत नाही. त्यामुळे अशा बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मृत्यू होत असतो. अशा प्रकारे २५६ उपजत मृत्यू झाले आहेत. त्यात जालना तालुक्यात ८, अंबड ३, बदनापूर २०, भोकरदन १०, घनसावंगी १०, जाफराबाद ५, मंठा ११, परतूर तालुक्यातील १८ उपजत मृत्यूंचा समावेश आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयात १७३ उपजत मृत्यू झाले आहेत.बालमृत्यू अन्वेषण !बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेणे आणि भविष्यात होणारे हे मृत्यू टाळणे यासाठी जिल्हास्तरावर बाल मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यात आली आहे. दरमहा समितीची बैठक होत असते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यू