शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जालना जिल्ह्यात वर्षभरात २११ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:50 IST

जिल्हाभरात २०१८ ते २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात २०१८ ते २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असली तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात आजही कुपोषण, विविध आजार, अज्ञान, जुन्या परंपरेमुळे आधुनिक उपचार घेण्यासाठी अनेक महिला पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक विवाहित महिला गरोदर राहण्याच्या काळापासून काळजी घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे उपजत, नवजात अर्भक तसेच 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या अवस्थेमुळे अनेक वेळा मातांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जालना जिल्ह्यात २०१८ -१९ या वर्षात 0 ते ५ वर्षे वयोगटातील २११ बालकांचा मृत्यू झाला आहे. सदर बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून, शहरी भागासह ग्रामीण भागात या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. बालमृत्यूंची संख्या पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात काळजी घेणे गरजेचे आहे.२५६ उपजत मृत्यूजिल्ह्यात २५६ उपजत मृत्यू झाले आहेत. कुपोषणामुळे आईच्या पोटात असलेल्या बाळाचे पोषण होत नाही. त्यामुळे अशा बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मृत्यू होत असतो. अशा प्रकारे २५६ उपजत मृत्यू झाले आहेत. त्यात जालना तालुक्यात ८, अंबड ३, बदनापूर २०, भोकरदन १०, घनसावंगी १०, जाफराबाद ५, मंठा ११, परतूर तालुक्यातील १८ उपजत मृत्यूंचा समावेश आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयात १७३ उपजत मृत्यू झाले आहेत.बालमृत्यू अन्वेषण !बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेणे आणि भविष्यात होणारे हे मृत्यू टाळणे यासाठी जिल्हास्तरावर बाल मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यात आली आहे. दरमहा समितीची बैठक होत असते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यू