शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जालना जिल्ह्यात ‘समृद्धी’ महामार्गासाठी १३३ हेक्टरचे होणार थेट भूसंपादन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:19 IST

जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी १३३ हेक्टर जमिनीचे थेट भूसंपादन केले जाणार आहे.

ठळक मुद्देसंपादनाची अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाने काढली आहे. त्यामुळे शेतकरी व प्रशासनातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

- बाबासाहेब म्हस्के 

जालना : जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी १३३ हेक्टर जमिनीचे थेट भूसंपादन केले जाणार आहे. तशी अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाने काढली आहे. त्यामुळे शेतकरी व प्रशासनातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम लवकर सुरू करायचे असल्याने शासनाला त्यासाठी आवश्यक जमीन ताब्यात घेण्याची घाई झाली आहे. या महामार्गासाठी जालना तालुक्यातील १५ गावांमधील ३६४ खरेदीखतांच्या माध्यमातून आतापर्यंत १७२.५९, तर बदनापूर तालुक्यातील  १० गावांमधील २६८ खरेदीखतांच्या माध्यमातून ११८ हेक्टर जमीन खरेदी पूर्ण झाली आहे. दोन्ही तालुक्यात शासकीय व खाजगी मिळवून आतापर्यंत ७५ टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. तर १३३ हेक्टर जमिनीचे संपादन अद्याप बाकी आहे.

यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर मोजणीतील त्रुटी व वाढीव मोबदल्यासाठी काही शेतकऱ्यांनी खरेदीखत अद्याप पूर्ण केलेले नाही. दोन्ही तालुके मिळवून केवळ २५ टक्के भूसंपादन बाकी असल्याने राज्यशासनाने ही जमीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादन कायद्यानुसार करण्याची अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाने २५ मे रोजी काढली आहे. भूसंपादन कायदा लागू झाल्यास शेतकऱ्यांना नियमानुसार केवळ चारपट मोबदला मिळणार आहे. शेवटची संधी म्हणून शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत थेट वाटाघाटीने खरेदी करून घ्यावी, असे सूचनेत नमूद आहे. शासन जमीन घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप समृद्धीबाधित शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

अधिसूचना प्रसिद्धी करण्यात आली आहेसमृद्धीमहामार्गासाठी १३३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन बाकी असून, ही जमीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार ताब्यात घेण्याची अधिसूचना प्रसिद्धी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना थेट वाटाघाटीने रस्ते विकास महामंडळास जमीन विक्री करायची आहे, त्यांनी तशी पूर्व संमती देवून खरेदीखताची प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करून घ्यावी. यात काही  बदल झाल्यास तशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली जाईल. - ए. व्ही. अरगुंडे , प्रादेशिक अधिकारी रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेती