शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जालना :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १२६ जणांना झटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:42 IST

वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.औरंगाबाद परिमंडळा अंतर्गत आता वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांनी दिली. गेल्याच आठवड्यात भरारी पथकाने जिल्ह्यात मोठी यशस्वी कारवाई केल्या नंतर पुन्हा एकदा वीज चोरांविरूध्द धडक मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी आणि विजेची गळती यामुळे जालना डी झोनमध्ये गेलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भारनियमन हे नित्याचीच बाब झाली आहे. हे थांबवून जे वीज ग्राहक नियमितपणे बिल भरतात, त्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीजेची थांबविणे हा एक महत्वाचा पर्याय असल्याचे हुमणे म्हणाले. जालना जिल्ह्यात वीज वितरणचे दोन विभाग पडतात. जालना -१ विभागात ३५ तर जालना-२ विभागामध्ये ९१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.या ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरवायची आहेत.मोहिमेत सातत्य राहणारजालना जिल्हा हा वीजचोरीसाठी यापूर्वी पासूनच नावाजलेला आहे. भरारी पथकानेही अनेक धनदांडग्यांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केल्याने आधीव खळबळ उडाली होती. आता पुन्हा या विशेष मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाले आहेत. एकूणच जे वीजचोरी करत असतील त्यांनी निदान आता तरी ती थांबवावी असे आवाहन अधीक्षक अभियंता हुमणे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून वीज चोरीची विशेष शोध मोहीम सुरू आहे. या अंतर्गत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट मुख्य वीज वाहिनीवरून आकडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकार जास्त घडत असल्याचे दिसून आले. हे आकडे जप्त केल्याने त्यांचा खच जमला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी