शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जालन्याचा मोसंबीप्रमाणेच ज्वारी, बाजरीच्या जीआय मानांकनासाठी प्रस्ताव

By संजय देशमुख  | Updated: August 2, 2022 15:48 IST

शाळू ज्वारी, पेशी गहू आणि बाजरीलाही जीआय मानांकन मिळावे म्हणून नाबार्डकडून पाठपुरावा केला जात आहे

- संजय देशमुखजालना : केंद्र सरकारने ‘एक जिल्हा- एक उत्पादन’ हे निर्यातीचे धोरण निश्चित केले आहे. असे असले तरी गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र आता निर्यातीत मागे पडला आहे. विशेष म्हणजे, जालन्यातून आजघडीला केवळ ०.३ टक्के एवढी कमी निर्यात होत आहे. हा टक्का वाढावा म्हणून आता नाबार्डकडून मोसंबीला ज्याप्रमाणे जालन्यात जीआय मानांकन मिळाले आहे, त्याच धर्तीवर शाळू ज्वारी आणि बाजरीला ते मिळावे म्हणून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना येथे नुकतीच एफआयओ, पुणे आणि येथील लघू उद्योग भारती या संघटनेकडून निर्यात वृद्धीवर कार्यशाळा घेण्यात आली. त्यात अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी देशाचे आगामी निर्यात धोरण हे सप्टेंबरमध्ये ठरणार आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्यांना जिल्हानिहाय ‘एक जिल्हा- एक उत्पादन’ हे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार एक जिल्हानिहाय निर्यातक्षम उत्पादनांचा आराखडा तयार करण्यास सांगितले होते.

त्यानुसार जालना जिल्ह्याचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यावर जालन्यातील उद्योजक, शेतकऱ्यांकडून अडचणी, तसेच कुठल्या उपाय योजना केल्यास जालन्याचा निर्यातीचा टप्पा वाढेल याचा मसुदा तयार केला जात असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात यांनी सांगितले. जालन्यात जवळपास लहान-मोठे असे १५ हजार उद्योग असल्याची माहिती त्यांनी दिली. असे असले तरी कृषीमध्ये मिरची, द्राक्ष आणि मोसंबीची निर्यात होत असल्याचे त्या म्हणाल्या. ही निर्यात एक टक्काही नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुणे येथील जीएफटीआयचे नायर यांनी निर्यातीला संधींची माहिती देऊन त्यासाठी सरकार कशी मदत करत आहे, हे सांगितले. दरम्यान, निर्यात आराखडा तयार करताना वाहतूक, उत्पादन साठविण्याची शास्त्रीय पद्धतीसाठी कोल्डस्टोरेज, मोसंबीचा रस अधिकाधिक.

जालना जिल्हा मोसंबी उत्पादक संघाने म्हणजेच अतुल लड्डा, पांडुरंग डोंगरे, भगवानराव पडूळ आदींनी यासाठी प्रयत्न केले आणि मोसंबीला जीआय मानांकन मिळाले. जालना आणि औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर मोसंबीचे उत्पादन होते. तसेच शाळू ज्वारी, पेशी गहू आणि बाजरीलाही जीआय मानांकन मिळावे म्हणून नाबार्डकडून पाठपुरावा केला जात असल्याची माहिती नाबार्डचे येथील जिल्हा व्यवस्थापक तेजल क्षीरसागर यांनी सांगून तसा प्रस्तावही लवकरच पाठविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती