शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

परत एकदा अवर्षणाशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:10 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर या चार तालुक्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सार्वाधिक टँकर भोकरदन तालुक्यात सुरू आहेत. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातून फेब्रुवारीतच काही गावांना तीव्र पाणी टंचाईचा करावा लागल्याने गावातून टँकरची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प आणि पाझर तलावात दोन महिने पुरेल इतकाच साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वाधिक निधी पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येतो. यामुळे पाणी टंचाईची शक्यता बघता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून,ज्या तालुक्यातून टँकरची मागणी आली त्यांना तातडीने दखल घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषद