शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

जायकवाडी- जालना शहर पाणीपुरवठा योजनेमुळे १८ गावांची भागली तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 22:50 IST

जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. पैठण ते जालना हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या शंभर किलोमीटरमध्ये ही जलवाहिनी जवळपास १९ गावांमधून जाते. यामुळे या गवांना अर्धा इंच पाईपमधून पाणी देण्याची व्यवस्था जालना पालिकेने केल्याने या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहराला पाणी समस्येने ग्रासले होते. मध्यंतरी विदर्भातील खडकपूर्णा धरणातून जलवाहिनी टाकून पाणी आणण्याच्या योजनेवर विचार झाला होता. परंतु तेथे जालन्यासाठी जे पाणी धरणात राखून ठेवावे लागते त्याचे आरक्षण नव्हते. त्यानंतर मग पैठण येथील जायकवाडी धरणाचा पर्याय समोर आला. त्यासाठी एका खाजगी सर्वेक्षण कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्या एजन्सीने जायकवाडी धरणातून पाणी आणतांना ते शिरनेर टेकडीपासून जालन्याला आणावे असा एक आणि नंतर अंबडहून हे पाणी जालन्यात नेता यईल असा अहवाल दिला होता. त्यामुळे अंबड येथून ही योजना आणण्याचे ठरले.ही योजना आणताना पुन्हा पूर्वी प्रमाणेच अंबड शहराचा मुद्दा उपस्थित झाला. पूर्वी जालना शहराला शहागड योजनेतून जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा होत होता. तो आता जायकवाडी धरणातून होत आहे. अंबड पालिकेने पुन्हा या पाणी मिळण्याच्या मुद्द्यावर हक्क सांगितल्याने जालना पालिकेची डोकेदुखी कायम आहे. अंबडने वीजबिल आणि पाण्याचे बिल देणे अपेक्षित आहे. परंतु, त्याची पूर्तता होत नसल्याने जालन्याला मुबलक पाणी मिळणे अवघड होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी