शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

जायकवाडी- जालना शहर पाणीपुरवठा योजनेमुळे १८ गावांची भागली तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 22:50 IST

जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. पैठण ते जालना हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या शंभर किलोमीटरमध्ये ही जलवाहिनी जवळपास १९ गावांमधून जाते. यामुळे या गवांना अर्धा इंच पाईपमधून पाणी देण्याची व्यवस्था जालना पालिकेने केल्याने या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहराला पाणी समस्येने ग्रासले होते. मध्यंतरी विदर्भातील खडकपूर्णा धरणातून जलवाहिनी टाकून पाणी आणण्याच्या योजनेवर विचार झाला होता. परंतु तेथे जालन्यासाठी जे पाणी धरणात राखून ठेवावे लागते त्याचे आरक्षण नव्हते. त्यानंतर मग पैठण येथील जायकवाडी धरणाचा पर्याय समोर आला. त्यासाठी एका खाजगी सर्वेक्षण कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्या एजन्सीने जायकवाडी धरणातून पाणी आणतांना ते शिरनेर टेकडीपासून जालन्याला आणावे असा एक आणि नंतर अंबडहून हे पाणी जालन्यात नेता यईल असा अहवाल दिला होता. त्यामुळे अंबड येथून ही योजना आणण्याचे ठरले.ही योजना आणताना पुन्हा पूर्वी प्रमाणेच अंबड शहराचा मुद्दा उपस्थित झाला. पूर्वी जालना शहराला शहागड योजनेतून जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा होत होता. तो आता जायकवाडी धरणातून होत आहे. अंबड पालिकेने पुन्हा या पाणी मिळण्याच्या मुद्द्यावर हक्क सांगितल्याने जालना पालिकेची डोकेदुखी कायम आहे. अंबडने वीजबिल आणि पाण्याचे बिल देणे अपेक्षित आहे. परंतु, त्याची पूर्तता होत नसल्याने जालन्याला मुबलक पाणी मिळणे अवघड होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी