शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

... तर मिळाली असती शंभर टक्के भरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:13 IST

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे विमा काढून जिल्ह्याचे नाव देशभरात नेले. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला. मात्र, दोनच वर्षांत याकडे पाठ फिरवली आणि येथेच घात झाला. फळबाग व रबी हंगामासाठी शेतक-यांनी पीकविमा काढला असता तर विमा कंपनीकडून शंभर टक्के भरपाई मिळाली असती.

बाबासाहेब म्हस्के/जालना : दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे विमा काढून जिल्ह्याचे नाव देशभरात नेले. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला. मात्र, दोनच वर्षांत याकडे पाठ फिरवली आणि येथेच घात झाला. फळबाग व रबी हंगामासाठी शेतक-यांनी पीकविमा काढला असता तर विमा कंपनीकडून शंभर टक्के भरपाई मिळाली असती. आता केवळ शासनाच्या मदतीवरच मदार आहे. जिल्ह्यात केवळ २२ हजार शेतकºयांनी रबी पीकविमा काढल्याचे समोर आले आहे. गारपिटीच्या घटनेने पीकविम्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.जालना जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जालना, मंठा, जाफराबाद, घनसावंगी, अंबड आणि परतूर तालुक्यातील हरभरा, गहू, ज्वारी, तूर, कांदा बियाणे या हंगामी पिकांसह द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील २२० गावांतील ३८ हजार ६४ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून, ते पूर्ण होण्यास किमान तीन ते चार दिवस लागतील. ज्या शेतकºयांनी रबी पीकविमा काढला आहे, त्यांना विमा कंपन्यांकडून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. तर ज्या शेतक-यांनी विमा काढलेला नाही, त्यांना शासनाकडून मदत मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, ती किती व कधी मिळणार, हा प्रश्न आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे. मात्र, मदतीसाठी शासनस्तरावर अद्याप कुठल्याच हालचाली सुरू नाहीत. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत असेच झाले तर शेतक-यांना शासनाच्या मदतीची वाट पाहत राहावी लागेल. याउलट विमा काढलेल्या शेतक-यांना जोखीम रक्कम म्हणून विमा कंपनीकडून भरपाई मिळणार आहे. उत्पादन वाढीसाठी ज्या प्रमाणे बियाणे खरेदीपासून महागडी खते, औषधींवर मोठा खर्च केला जातो, त्याचप्रमाणे पिकांची सुरक्षा म्हणून मातीत स्वप्ने पेरणा-या बळीराजाने आता तरी पीकविमा काढण्यास प्राधान्य देणे यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. या रबी हंगामात केवळ २२ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला असून, यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकºयांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतक-यांची संख्या व रबीचे एकूण क्षेत्र पाहता हे प्रमाण खूपच कमी आहे.---------------आवाहनाकडे दुर्लक्षजालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, थार आदी भागातील द्राक्ष बागायतदारांनी या वर्षी द्राक्ष बागांचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने वारंवार बैठका घेऊन केले होते. मात्र, बहुतांश शेतक-यांनी या भागात गारपीट होत नाही, असे म्हणत विमा काढण्याला प्राधान्य दिले नाही. याची मोठी किमंत शेतक-यांना मोजावी लागली.....................................गतवर्षी जिल्ह्याच्या काही भागांत शेतक-यांनी पीकविमा काढावा यासाठी जनजागृती करण्यात आली. शेतक-यांनी आता तरी उत्पादन वाढीसाठी केल्या जाणाºया खर्चाप्रमाणे पिकांची जोखीम म्हणून शेतक-यांनी पीकविमा काढून घेण्याची गरज आहे.- दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना.----------गारपिटीमुळे तालुकानिहाय झालेले नुकसानतालुका गावांचीसंख्या बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)जालना ६२ १३२५७जाफराबाद ४८ ९१७१मंठा ४५ १२९६४अंबड ५३ १७४०घनसावंगी १२ ९३४