शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला महत्त्व देणे गरजेचे - धनाजी गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:24 IST

भाजपकडून संविधानाला धोका असून, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जातीयवादी सरकारला हद्दपार करण्याची संधी त्यांना आगामी काळात असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते धनाजी गुरव (कोल्हापूर) यांनी मंगळवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राम मंदिर, पाकिस्तान आणि अन्य अनेक भावनिक मुद्यांवर भाजपकडून सामान्यांची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान आणि त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळणे गरजेचे आहे. भाजपकडून संविधानाला धोका असून, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जातीयवादी सरकारला हद्दपार करण्याची संधी त्यांना आगामी काळात असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते धनाजी गुरव (कोल्हापूर) यांनी मंगळवारी केले.डाव्या आघाडीतर्फे मंगळवारी डॉ. भगवानसेवा मंगल कार्यालयात श्रमिक जनतेच्या जाहीरनाम्याचे जाहीर वाचन करण्यात येऊन त्यांवर विचार मंथन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव राख हे होते. यावेळी कामगार नेते आसाराम लोमटे, प्रा. संजय लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. लकडे यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.पुढे बोलताना धनाजी गुरव यांनी चौफेर मांडणी केली. एकूणच श्रमिकांचे कैवारी म्हणून घेणारे हे केंद्र आणि राज्य सरकार केवळ जुमले बाजी करते. अर्थसंकल्पात लोक कल्याणकारी योजनांची जंत्री वाजवायची आणि प्रत्यक्षात त्यावर कवडीही खर्च करायची नाही, अशी अवस्था या सरकारांनी केली आहे. लोकशाहीला आता भारतात पर्याय नाही, परंतु ती चांगली लोकशाही हवी. केवळ मूठभरांच्या हाती सत्ता असल्याने त्यांना हवे तसेच ते वदवून घेत आहेत.पाकिस्तानवर हल्ला करून त्याचा निवडणुकीत उपयोग होत असेल तर, ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही देखील देशप्रेमी आहोत. परंतु राम मंदिर आणि पाकिस्तानचे भावनिक मुद्दे जनमानसावर बिंंबवून गंभीर प्रश्नांपासून निवडणूक दूर नेली जात आहे. हे त्यांचे षडयंत्र असल्याचा आरोपही गुरव यांनी केला. श्रमिकांनी देखील त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आसाराम लोमटे यांनी सिंचन, शेतकरी तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर लोमटे यांनी विचार मांडले. महाराष्ट्रात माथाडी, रोजगार हमी आणि अन्य अनेक कायदे हे कामगार संघटनांनी एकत्रित येऊन केल्यानेच त्यांचे आज मोठे महत्त्व आणि गरज निर्माण झाली आहे. आज जायकवाडीतील पाणीपातळी शून्य टक्क्यांवर आली असून, नगर, नाशिक मधून आपल्याला पाणी देण्यास विरोध होणे ही बाब निश्चित एकसंध महाराष्ट्राला न शोभणारी असल्याचे प्रतिपादन संजय लकडे यांनी केले.यावेळी माजी मंत्री शंकरराव राख यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यांनी सद्यस्थितीवर परखड मत मांडून देशातील एकूणच प्रचार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा समाचार घेतला. यावेळी कामगारनेते अण्णा सावंत, प्रा. नारायण बोराडे, प्रा. राजकुमार वलसे, डॉ. रमेश अग्रवाल, यशवंत सोनुने, अनिल मिसाळ, संदीप शिंदे, प्रा.सुभाष देठे, शेख मुजीब, शेख शाकीर आदींची उपस्थिती होती.भांडवलदारांसाठी पायघड्यादेशाचे पंतप्रधान म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएल पूर्णपणे डबघाईला आलेले असताना अंबानींच्या मोबाईल कंपनीला जी मदत केली आहे ती निश्चित चुकीची म्हणावी लागेल. शिक्षण, आरोग्य, निवारा पुरवणे हे कल्याणकारी राज्याचे ध्येय आहे. असे असताना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे आम्हाला शाळा चालवणे परवडत नसल्याने आम्ही त्या बंद करत असल्याचे सांगतात शाळा चालवणे म्हणजे सरकारने काय उद्योग समजला आहे काय, असा सवालही गुरव यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण