शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

बलिदान देणाऱ्यांविषयी कृतज्ञता बाळगणे नागरिकांचे कर्तव्य- देवकर्ण मदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:58 IST

भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अलीकडच्या काळात देशभक्तीचा ज्वर वाढला आहे राष्ट्र निष्ठा, देशभक्ती अवश्य हवी. पक्ष, विचारधारा कुठलीही असो; भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले.आनंद फाऊंडेशनतर्फे मसाप जालना शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि ग्रंथ प्रकाशन व कवि संमेलन सोहळा मंगळवारी महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्या सभागृहात उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे होते. आनंद फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ शिवाजी मदन, डॉ. नारायण बोराडे, डॉ. आदिनाथ पाटील, डॉ. कार्तिक गावंडे, डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. दिलीप अर्जुने डॉ. भारत खंदारे, डॉ.राजेंद्र उढाण, प्राचार्य रामलाल अग्रवाल, प्रा संदीप पाटील, संजय लहाने, प्रतिमा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. देवकर्ण मदन यांनी पैसे कमावण्याची वाढलेली तृष्णा, पालकांचा स्वार्थासाठी होत असलेला वापर, विस्कळीत कुटुंब व्यवस्था इ. विषयांवर भाष्य करतांना जागतिकीकरणाच्या लाटेत पैसा हेच साध्य झाले असल्याने खरा आनंद हिरावला असल्याची खंत व्यक्त केली, जिल्ह्यास दर्जेदार साहित्य परंपरा असून, म.सा.प.चे पदाधिकारी साहित्य चळवळ बळकट करतील असा विश्वास मदन यांनी व्यक्त केला.सत्कारास उत्तर देताना मसाप चे सचिव पंडित तडेगावकर म्हणाले की, म.सा.प. ने समाजातील प्रत्येक घटकांचा आवाज शासन, न्यायालया पर्यंत पोहोचविला आहे, प्रसंगी आंदोलने केली. सर्वांच्या सहकार्याने नवीन सभासद जोडून नव लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. त्यांना उभे करण्यास मसाप प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही तडेगावकर यांनी दिली.डॉ. ज्योती धर्माधिकारी लिखित विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी ग्रंथ निर्मिती, संशोधन व ग्रंथाविषयी अनुभव कथन केले. प्रास्ताविकात डॉ. नारायण बोराडे यांनी निखळ सामाजिक कार्यासाठी आनंद फाऊंडेशनची स्थापना झाली असून, राबविलेले व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कार्तिक गावंडे यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्यानंतर शम्स जालनवी, आबा पाटील ( बेळगाव) संतोष नारायण कर (परभणी) धनंजय गव्हाले ( सिल्लोड) यांचे बहारदार कविसंमेलन झाले. यावेळी रसिकांची उपस्थिती होती.यांचा झाला सत्कार...मसाप जालनाचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडित तडेगावकर, कोषाध्यक्ष कैलास भाले, सहसचिव ज्योती धर्माधिकारी, सदस्य डॉ.गजानन जाधव, सुनंदा तिडके, गोविंदप्रसाद मुंदडा, एस. एन. कुलकर्णी, विलास भुतेकर, शिवाजी कायंदे, प्रतिभा श्रीपत, दादासाहेब गि-हे, राम गायकवाड, उध्दव थोरवे, सुरेखा मत्सावार, शशिकांत पाटील, जगन्नाथ खंडागळे, विमल आगलावे, ज्ञानदेव पायगव्हाणे, सुलभा कुलकर्णी, सुधाकर जाधव, भगवंत ठाले पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती नारायण बोराडे यांनी दिली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक