शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पुरुषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:01 IST

मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बुधवारी ‘सावित्रींच्या लेकी घरोघरी, शोध ज्योतिबांचा जारी’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे या होत्या. यावेळी डॉ. स्मिता चव्हाण, अनिता जाधव, व्याख्यानमालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहूळे, मिलींद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रशांत आढाव प्रमुख उपस्थिती होती.अश्विनी सातव म्हणाल्या, परंपरेच्या जोखडांविरूध्द सावित्रीबाई उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या जोतिबांची आज गरज आहे. आयटी क्षेत्रातील तरुणी पोथी-पुराणात अडकलेल्या आहेत. महिलेला माहेरी, सासरी कुठेच स्थान नसते. केवळ नऊ महिन्यांचा गर्भच तिची संपत्ती आहे. मुलगा होत नाही तर सोडून दे, अशी हिणवणी केली जाते. सरकार एकीकडे बेटी-बचावचा नारा देत असतांना त्यांचेच लोक अत्याचार करत आहेत. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारखे सहजीवन प्रत्येक महिलेस लाभावे, तेव्हाच खरी समता येईल. स्त्री कुणाच्या मालकीची आहे, ही मानसिकता बदलावी लागेल. काळजी वाटूच नये असा समाज निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. पार्वताबाई रत्नपारखे यांनी व्याख्यानमाला यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. डॉ. स्मिता चव्हाण यांनी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले. अनिता जाधव यांनी समतेचा भारत उभा करण्यासाठी महिलांनी तयार व्हावे असे सांगितले. वैशाली गरड यांनी सूत्रसंचालन केले. आदर्शा शरणागत यांनी आभार मानले.

टॅग्स :WomenमहिलाSocialसामाजिक