शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:01 IST

मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बुधवारी ‘सावित्रींच्या लेकी घरोघरी, शोध ज्योतिबांचा जारी’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे या होत्या. यावेळी डॉ. स्मिता चव्हाण, अनिता जाधव, व्याख्यानमालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहूळे, मिलींद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रशांत आढाव प्रमुख उपस्थिती होती.अश्विनी सातव म्हणाल्या, परंपरेच्या जोखडांविरूध्द सावित्रीबाई उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या जोतिबांची आज गरज आहे. आयटी क्षेत्रातील तरुणी पोथी-पुराणात अडकलेल्या आहेत. महिलेला माहेरी, सासरी कुठेच स्थान नसते. केवळ नऊ महिन्यांचा गर्भच तिची संपत्ती आहे. मुलगा होत नाही तर सोडून दे, अशी हिणवणी केली जाते. सरकार एकीकडे बेटी-बचावचा नारा देत असतांना त्यांचेच लोक अत्याचार करत आहेत. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारखे सहजीवन प्रत्येक महिलेस लाभावे, तेव्हाच खरी समता येईल. स्त्री कुणाच्या मालकीची आहे, ही मानसिकता बदलावी लागेल. काळजी वाटूच नये असा समाज निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. पार्वताबाई रत्नपारखे यांनी व्याख्यानमाला यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. डॉ. स्मिता चव्हाण यांनी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले. अनिता जाधव यांनी समतेचा भारत उभा करण्यासाठी महिलांनी तयार व्हावे असे सांगितले. वैशाली गरड यांनी सूत्रसंचालन केले. आदर्शा शरणागत यांनी आभार मानले.

टॅग्स :WomenमहिलाSocialसामाजिक