शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विहिरींची चौकशी; अनुदानावरूनही खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:40 IST

कृषी विभागाकडून रोटावेटरचे अनुदान रखडणे, कंत्राटदारांकडून दर्जेदार काम न होणे यासह अन्य मुद्यांवरून बुधवारी जिल्हा परिषदेची स्थायी सभा गाजली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोजगार हमी योजनेतून दुष्काळावर मात करण्यासाठी जवळपास ५९५ विहिरींना मंजुरी मिळाली होती. परंतु यापैकी २५२ विहिरींना सभागृहाची मान्यता न घेता एकाच दिवशी मान्यता आणि एकाच दिवशी तांत्रिक मान्यता देण्यात आली. तरी या २५२ विहिरींपैकी केवळ एका विहिरीचे काम पूर्ण झाले. कृषी विभागाकडून रोटावेटरचे अनुदान रखडणे, कंत्राटदारांकडून दर्जेदार काम न होणे यासह अन्य मुद्यांवरून बुधवारी जिल्हा परिषदेची स्थायी सभा गाजली.अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भाजपचे सदस्य शालिकराम म्हस्के यांनी विहिरींसह अनेक मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुष्काळ निवारण करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून जालना जिल्ह्यात जवळपास ५९५ विहिरींना मान्यता मिळाली होती. असे असतांना त्या पैकी २५२ विहिरींच्या कामांना छाननी समितीची मंजूरी मिळाल्याचे उत्तर सभागृहात दिले. मात्र, या उत्तरामुळे म्हस्के यांचे समाधान झाले नाही.सार्वजनिक विहिरींचे प्रस्ताव कोणत्या तारखेत प्राप्त झाले होते आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने या प्रस्तावांना कोणत्या तारखेत मंजूरी दिली? ही माहिती सभागृहात सादर करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मग्रारोहयो कक्षातर्फे कराड यांनी प्राप्त प्रस्तावांच्या तारखा आणि छाननी समितीच्या मंजूरीच्या तारखा सभागृहात वाचून दाखविल्यानंतर म्हस्के यांनी पुन्हा आक्रमक भूमिका या दोन्ही प्रक्रिया एकाच तारखेत कशा होऊ शकतात, असा सवाल उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली.याचवेळी बप्पासाहेब गोल्डे यांनी कृषी विभागातर्फे ज्या शेतक-यांना रोटावेटर ट्रॅक्टर, कडबा कुट्टी इत्यादी साहित्याचा लाभ देण्यात आला. अशा शेतकºयांना गेल्या दीड वषार्पासून अनुदान देण्यास टाळाटाळ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. योवळी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी याची गंभीर दखल घेत, हे अनुदान न वाटणा-या दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले.जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वच तालुक्यात शंभर टक्के पिक बाधीत झालेली असतांना अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांमध्ये नुकसानीची आकडेवारी कोणत्या आधारे कमी दर्शवण्यात आली, असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करत शेतक-यांना भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या.वादळी चर्चा : आरोग्य अधिका-यांची चौकशीयावेळी जयमंगल जाधव यांनी तत्कालीन आरोग्य अघिकारी गीते यांच्या १ कोटी ४६ लाख रूपयांच्या कामांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी गीतेंची विभागीय चौकशी सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले.जिल्हा परिषदेतील विविध कामे ज्या एजंसींना देण्यात आली आहेत, ते दर्जेदार कामे करत नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली. योवळी धनादेश चोरी प्रकरणातील संशयीत आरोपींच्या एजंसीला काम कसे दिले असा सवालही त्यांनी केला.यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर, सभापती दत्तात्रय बनसोडे, सौ. सुमनबाई घुगे, श्रीमती जिजाबाई कळंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदPoliticsराजकारणFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना