शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

आठ रूपयांपासून ते शंभर रूपयांपर्यंत विमा शेतकऱ्यांच्या हाती; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:56 IST

काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

- प्रकाश मिरगे

जाफराबाद (जालना ) : येथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण व्हावे, म्हणून शंभर रूपयांपासून ते हजारो रूपयांपर्यंत पीक विम्याचा भरणा केला. त्यानूसार नूकसान भरपाई म्हणून बँकामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे.  परंतु काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

शेतकऱ्यांनी दिवसभर रांगेत उभे राहून पीक विम्याचा भरणा केला. भरणा केलेल्या रकमेपेक्षा किमान दोन पट रक्कम मिळणे आवश्यक असताना  ती रक्कम मिळत नसल्याने विमाधारक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. पीक विम्याच्या नावाखाली बँकांनी जवळपास ५६ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा जमा केला. 

हिवराबळी येथील भाऊराव किसान लोखंडे यांनी चारशे आठ रूपयांचा विमा भरला. परंतु त्यांना फक्त आठ रूपयाचा विमा मिळाला. नळविहारा येथील भारत मोरे या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणून ६७७ रूपये भरले. त्यांच्याही खात्यात आठ रूपये जमा झाले.तसेच शरद मोरे यांनी ११८४ रूपयांचा विमा भरला त्यांच्या खात्यातर २०० रूपये जमा झाले. 

शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा आठ, दहा, शंभर, दोनशे, पाचशे रूपये  बँकेच्या खात्यात जमा होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. विमा रक्कम कमी आली, याचा शोध घेण्यासाठी शेतकरी बँकेकडे चकरा मारत आहे. मात्र बँक अधिकारी शेतकऱ्यांना काहीच सांगत नसल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना  विमा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विमा संरक्षण रकमेचा जाफराबाद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.  

बँकांना आकड्यांचा ताळमेळ लागेनाजिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्यांचा किती पीकविमा स्वीकारला यांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा नेमका फायदा किती होणार याची आकडेवारी कुठेच मिळत नाही. जूनच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अशा सूचना शासनाच्या वतीने बँकांना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही बँकांनी रक्कम जमा केली नाही. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र