शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कायद्यानुसारच करवाढ करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:33 IST

जालना नगर पालिकेने जी नवीन वाढीव करवाढ लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चौकटीतीच राहून घ्यावा.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर यांनी घेतला करवाढीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेने जी नवीन वाढीव करवाढ लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चौकटीतीच राहून घ्यावा. नागरीकांवर अधिकचा वाढीव कर्जाचा बोजा पडू नये याची काळजी घेऊनच ही करवाढ करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.खोतकर यांच्या पुढाकाराने सोमवारी नवीन करवाढीसंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, नगर पालिकेने अवाजवी कर वाढविला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत असून अवाजवी कराची आकारणी न करता कायद्याच्या चौकटीत बसून कराची आकारणी करण्यात यावी नगर पालिकेकडून नागरिकांकडून कर आकारण्यात येतो परंतु त्यांना सेवा देताना त्या दर्जेदार स्वरूपाच्या देण्यात याव्यात पाणीपट्टीच्या स्वरूपात नागरिकांकडून कर वसूल करण्यात येतो नागरिकांना पाण्याचा सुरळीत पुरववठा करण्यात यावा शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन आहेत.अशांवर कारवाई व्हावी असेही खोतकर म्हणाले. मालमत्ताचे सर्वेक्षण चुकीचे झाले असल्यास ते पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देशही राजमंत्री खोतकर यांनी यावेळी दिले.ेयावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी खांडेकर करवाढ कशी होते या बद्दल सविस्तर सांगितले. दरम्यान शिवसेनेची भूमिका मांडताना अंबेकर यांनी सांगितले की, पूर्वी ४४ हजार मालमत्ता होत्या. त्यांना चार कोटी रूपयांचा कर होता. आता त्यात दोन किंवा तीनपट वाढ झाल्यास हरकत नाही. परंतु सध्या करवाढीच्या नोटीसा या अवाजवी असल्याचे सांगून त्यावर फेरविचार करण्याची मागणी केली. दरम्यान नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी करवाढ करताना ती अचानक न करता त्यासाठी जनसुनवाणीची संधी नागरीकांना दिली असून, त्यांच्याकडून आक्षेप मागविण्यात येत आहेत. या आक्षेपांवर सुनावणी होऊनच योग्य ती करवाढ केली जाईल. यावेळी कैलास गोरंट्याल यांनी त्यांचे मत मांडले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदArjun Khotkarअर्जुन खोतकरTaxकर