शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

देऊळगावराजा येथे रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या ...

देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी देऊळगावराजा शहराला भेट दिली. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी केलेल्या चर्चेत या पथकाने सकारात्मक भूमिका मांडल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

जैन व त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच श्री बालाजी महाराज यांच्या भरणाऱ्या यात्रेची माहिती घेतली. शिवाय कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांची मते जाणून घेतली. तालुक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीकडून या ठिकणी घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची माहिती घेण्यात आली. शिवाय खडकपूर्णा प्रकल्पामुळे या परिसरात बागायती क्षेत्रात वाढल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही हा रेल्वे मार्ग का आवश्यक आहे? हे उदाहरणांसह पटवून दिले. उपस्थित अनेक मान्यवरांनीही या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक भूमिका मांडत त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सुनीता शिंदे, डॉ. रामदास शिंदे, रमेश कायंदे, सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे पदाधिकारी, तहसीलदार सारिका भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जगदाळे, सचिव किशोर म्हस्के यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक अहवाल देणार

देऊळगाव राजा येथील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जैन यांनी आपण सकारात्मक अहवाल रेल्वे विभागाला देणार असल्याचे सांगितले. तसेच देऊळगावराजा येथील नागरिकांमध्ये रेल्वे मार्गासाठी असलेला उत्साह हा वाखाणण्याजोगा असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री बालाजी महाराजांची नगरी असल्याने या ठिकाणाहून हा मार्ग गेल्यास आपल्याला आनंद होईल, असेही जैन यांनी यावेळी सांगितले.

शेकडो वर्षांपासून पाठपुरावा

इंग्रजांच्या काळात जालना ते खामगाव या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करून ठिकठिकाणी मार्किंग करण्यात आले. मात्र, उत्पन्नाच्या कारणावरून हे काम रखडले होते. त्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. २०१६ मध्ये भाजप शासनाने पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तीन हजार कोटी रुपयांना तत्त्वत: मान्यता दिली होती. यातील काही रक्कम राज्य शासन, तर काही रक्कम खाजगी विकासक देतील, असे ठरले होते; परंतु ही फाइल लालफितीत अडकली. या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे या समितीने सकारात्मक अहवाल दिला तर हा विकासाचा मार्गही मोकळा होणार आहे.