शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा येथे रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या ...

देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी देऊळगावराजा शहराला भेट दिली. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी केलेल्या चर्चेत या पथकाने सकारात्मक भूमिका मांडल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

जैन व त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच श्री बालाजी महाराज यांच्या भरणाऱ्या यात्रेची माहिती घेतली. शिवाय कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांची मते जाणून घेतली. तालुक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीकडून या ठिकणी घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची माहिती घेण्यात आली. शिवाय खडकपूर्णा प्रकल्पामुळे या परिसरात बागायती क्षेत्रात वाढल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही हा रेल्वे मार्ग का आवश्यक आहे? हे उदाहरणांसह पटवून दिले. उपस्थित अनेक मान्यवरांनीही या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक भूमिका मांडत त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सुनीता शिंदे, डॉ. रामदास शिंदे, रमेश कायंदे, सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे पदाधिकारी, तहसीलदार सारिका भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जगदाळे, सचिव किशोर म्हस्के यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक अहवाल देणार

देऊळगाव राजा येथील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जैन यांनी आपण सकारात्मक अहवाल रेल्वे विभागाला देणार असल्याचे सांगितले. तसेच देऊळगावराजा येथील नागरिकांमध्ये रेल्वे मार्गासाठी असलेला उत्साह हा वाखाणण्याजोगा असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री बालाजी महाराजांची नगरी असल्याने या ठिकाणाहून हा मार्ग गेल्यास आपल्याला आनंद होईल, असेही जैन यांनी यावेळी सांगितले.

शेकडो वर्षांपासून पाठपुरावा

इंग्रजांच्या काळात जालना ते खामगाव या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करून ठिकठिकाणी मार्किंग करण्यात आले. मात्र, उत्पन्नाच्या कारणावरून हे काम रखडले होते. त्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. २०१६ मध्ये भाजप शासनाने पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तीन हजार कोटी रुपयांना तत्त्वत: मान्यता दिली होती. यातील काही रक्कम राज्य शासन, तर काही रक्कम खाजगी विकासक देतील, असे ठरले होते; परंतु ही फाइल लालफितीत अडकली. या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे या समितीने सकारात्मक अहवाल दिला तर हा विकासाचा मार्गही मोकळा होणार आहे.