शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By दिपक ढोले  | Updated: March 18, 2023 18:32 IST

जालना जिल्हा प्रशासनाला दिले पंचनाम्याचे आदेश

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद न साधता अवघ्या आठ मिनिटांत त्यांनी पाहणी दौरा आवरल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

वडीगोद्री येथे गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू, हरभरा, ज्वारी पिकांसह मोसंबीचे अतोनात नुकसान झाले आहे. शनिवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे बीड येथून भोकरदनकडे जात होते. त्यांनी अचानक अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे आपल्या वाहनांचा ताफा थांबवून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंतरवाली सराटी शिवारातील गट नंबर १९७ मधील संजय कुमार तांदळे यांच्या शेतात आडवा झालेल्या गव्हाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे यांना दिले.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, गणेश गावडे, बप्पासाहेब काळे, उमेश बर्वे, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी हनुमंत काळे, कैलास माने, ऋषिकेश लिपणे, पवन पवार, रवींद्र घाडगे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारJalanaजालनाFarmerशेतकरी