शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

जलयुक्तमुळे परिस्थितीत सुधार - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:10 IST

राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले. तालुक्यातील जवखेडा खूर्द येथे जलपूजन व मत्स्य बोटुकली शेततळ्यात सोडून  पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते करण्यात आली.या वेळी खा.रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, भास्कर दानवे, आशा पांडे, राजेंद्र देशमुख, तुकाराम जाधव, उपविभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी, सुनील जयभाये, संतोष गोरड, शालिकराम म्हस्के, मधुकर दानवे, गणेश फुके, आर.के.जाधव, सुधाकर दानवे, गणेश ठाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आ.संतोष दानवे यांनी राज्यपालाचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.यावेळी खा.रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्दीष्ट शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे व यासाठी शेतीमध्ये भरीव गुंतवणूक करण्याची  भाजपा सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे असे सांगितले, तर राज्यपाल म्हणाले की, दानवे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील शेतक-यांसाठी पुरक उद्योग म्हणून शेततळ्यात पिंजरा मत्स्यपालन   हा नावीन्यपूर्ण प्रकल्प जवखेडा ता. भोकरदन, येथून सुरू होत आहे. तो राज्यासाठी पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन विद्यासागर राव यांनी केले. यावेळी आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, डॉ.विवेक वर्तक आणि अशोक गायकर यांनी राज्यपालांना या संशोधनाची माहिती दिली त्यावर राज्यपालांनी हे संशोधन शेतक-यांनसाठी उपयुक्त ठरणारे असल्याचे सांगितले. असे प्रकल्प राज्यातील इतर भागातही राबविता येतील काय, याचा आभ्यास तज्ज्ञांनी करावा असा सल्लाही विद्यासागर राव यांनी दिला.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना