शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

जलयुक्तमुळे परिस्थितीत सुधार - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:10 IST

राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले. तालुक्यातील जवखेडा खूर्द येथे जलपूजन व मत्स्य बोटुकली शेततळ्यात सोडून  पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते करण्यात आली.या वेळी खा.रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, भास्कर दानवे, आशा पांडे, राजेंद्र देशमुख, तुकाराम जाधव, उपविभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी, सुनील जयभाये, संतोष गोरड, शालिकराम म्हस्के, मधुकर दानवे, गणेश फुके, आर.के.जाधव, सुधाकर दानवे, गणेश ठाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आ.संतोष दानवे यांनी राज्यपालाचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.यावेळी खा.रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्दीष्ट शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे व यासाठी शेतीमध्ये भरीव गुंतवणूक करण्याची  भाजपा सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे असे सांगितले, तर राज्यपाल म्हणाले की, दानवे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील शेतक-यांसाठी पुरक उद्योग म्हणून शेततळ्यात पिंजरा मत्स्यपालन   हा नावीन्यपूर्ण प्रकल्प जवखेडा ता. भोकरदन, येथून सुरू होत आहे. तो राज्यासाठी पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन विद्यासागर राव यांनी केले. यावेळी आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, डॉ.विवेक वर्तक आणि अशोक गायकर यांनी राज्यपालांना या संशोधनाची माहिती दिली त्यावर राज्यपालांनी हे संशोधन शेतक-यांनसाठी उपयुक्त ठरणारे असल्याचे सांगितले. असे प्रकल्प राज्यातील इतर भागातही राबविता येतील काय, याचा आभ्यास तज्ज्ञांनी करावा असा सल्लाही विद्यासागर राव यांनी दिला.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना