शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रत्यक्ष कृतीला महत्त्व हेच गांधी विचाराचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:51 IST

गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आजच्या संदर्भात गांधी विचार आणि युवा या विषयावर आयोजित पाच दिवसीय निवासी १५ व्या राज्यस्तरीय गांधी विचार शिबिराचा समारोप सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव श्रीनिवास भक्कड, पुरुषोत्तम बगडिया, ज्ञानप्रकाश मोदाणी, प्राचार्य डॉ.जवाहर काबरा, मनोज ठाकरे, डॉ.यशवंत सोनुने आणि डॉ. महावीर सदावर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मनोज ठाकरे यांनी सादर केलेल्या क्रांती गीताने झाली तर जेष्ठ सतारवादक सखाराम बोरूळ आणि श्रीकांत मुकिम यांनी सादर केलेल्या राम धूनने झाली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विष्णू दौलतराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पुढे बोलताना गोपाळ म्हणाले, गांधींचे व्यक्तिमत्व, वैचारिकत्व हे सर्वव्यापी आहे. गांधी विचारांचा शोध घेणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून आपण गांधींचा शोध स्वच्छता, तंटामुक्त अशा गटा- गटात घेतो. महापुरुषांची आपसात तुलना करतो असे न करता त्यांचा त्याग महत्त्वाचा मानून राष्ट्रउभारणीत मदत करावी असेही ते म्हणाले. आजचा विकास आपण निसर्गाला वजा करून करतो आहे. त्यामुळे आपला शाश्वत विकास होत नाही. जंगलतोड करून, निसर्गाचा ºहास करुन कधीच विकास होत नसतो. हेच गांधी विचारांचे सार तरुणांनी लक्षात घ्यावे.उद्योजक ज्ञानप्रकाश मोदानी म्हणाले, जेईएस सारखे महाविद्यालय हे खऱ्या अर्थाने ज्ञानतीर्थ झाले आहेत. गेल्या ६१ वर्षापासून या पावन भूमीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. आपल्या शाळा- महाविद्यालये ही ज्ञानतीर्थे बनली पाहिजेत असेही ते म्हणाले.याप्रसंगी उद्योजक सुनील रायठठ्ठा, माजी उपप्राचार्य हरिकिशन मुंदडा, उपप्राचार्य डॉ. संध्या रोटकर, प्रा. बसवराज कोरे, डॉ. कैलास इंगले, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. प्रतिभा श्रीपत, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. ज्योती धर्माधिकारी, डॉ. दादासाहेब गिºहे, डॉ. उमेश मुंढे, भास्कर पडूळ, डॉ. राज रणधीर, बाबूराव व्यवहारे, प्राचार्य राम भाले, डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. धर्मेंद्र राजपूत, ज्ञानेश्वर वाघमारे, लक्ष्मण झरेकर आदींची उपस्थिती होती.या शिबिरात प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील ८ विद्यापीठातील ७७ शिबिरार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वसंत ऊगले, डॉ.वसंत पवार, डॉ.शिवानंद मुंढे, डॉ. प्रवीण चंदनशिवे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक