शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

प्रत्यक्ष कृतीला महत्त्व हेच गांधी विचाराचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:51 IST

गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आजच्या संदर्भात गांधी विचार आणि युवा या विषयावर आयोजित पाच दिवसीय निवासी १५ व्या राज्यस्तरीय गांधी विचार शिबिराचा समारोप सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव श्रीनिवास भक्कड, पुरुषोत्तम बगडिया, ज्ञानप्रकाश मोदाणी, प्राचार्य डॉ.जवाहर काबरा, मनोज ठाकरे, डॉ.यशवंत सोनुने आणि डॉ. महावीर सदावर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मनोज ठाकरे यांनी सादर केलेल्या क्रांती गीताने झाली तर जेष्ठ सतारवादक सखाराम बोरूळ आणि श्रीकांत मुकिम यांनी सादर केलेल्या राम धूनने झाली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विष्णू दौलतराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पुढे बोलताना गोपाळ म्हणाले, गांधींचे व्यक्तिमत्व, वैचारिकत्व हे सर्वव्यापी आहे. गांधी विचारांचा शोध घेणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून आपण गांधींचा शोध स्वच्छता, तंटामुक्त अशा गटा- गटात घेतो. महापुरुषांची आपसात तुलना करतो असे न करता त्यांचा त्याग महत्त्वाचा मानून राष्ट्रउभारणीत मदत करावी असेही ते म्हणाले. आजचा विकास आपण निसर्गाला वजा करून करतो आहे. त्यामुळे आपला शाश्वत विकास होत नाही. जंगलतोड करून, निसर्गाचा ºहास करुन कधीच विकास होत नसतो. हेच गांधी विचारांचे सार तरुणांनी लक्षात घ्यावे.उद्योजक ज्ञानप्रकाश मोदानी म्हणाले, जेईएस सारखे महाविद्यालय हे खऱ्या अर्थाने ज्ञानतीर्थ झाले आहेत. गेल्या ६१ वर्षापासून या पावन भूमीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. आपल्या शाळा- महाविद्यालये ही ज्ञानतीर्थे बनली पाहिजेत असेही ते म्हणाले.याप्रसंगी उद्योजक सुनील रायठठ्ठा, माजी उपप्राचार्य हरिकिशन मुंदडा, उपप्राचार्य डॉ. संध्या रोटकर, प्रा. बसवराज कोरे, डॉ. कैलास इंगले, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. प्रतिभा श्रीपत, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. ज्योती धर्माधिकारी, डॉ. दादासाहेब गिºहे, डॉ. उमेश मुंढे, भास्कर पडूळ, डॉ. राज रणधीर, बाबूराव व्यवहारे, प्राचार्य राम भाले, डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. धर्मेंद्र राजपूत, ज्ञानेश्वर वाघमारे, लक्ष्मण झरेकर आदींची उपस्थिती होती.या शिबिरात प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील ८ विद्यापीठातील ७७ शिबिरार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वसंत ऊगले, डॉ.वसंत पवार, डॉ.शिवानंद मुंढे, डॉ. प्रवीण चंदनशिवे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक