शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या...

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 19:45 IST

आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

- अशोक डोरलेअंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण मागील सात दिवसांपासून सुरू आहे. शासनाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतायत याचा अभिमान वाटतो. परंतु, आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील सात दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. लाठीचार्ज, गोळीबार प्रकरणानंतर या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांच्या भावना 'लोकमत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनोज जरंगे यांच्या घरी आजोबा रावसाहेब जरांगे, आजी पर्वती जरंगे, पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज, मुली वैष्णवी, प्रणाली, पल्लवी हे होते. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मनोज जरांगे व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलांचे शिक्षण सुरू असून, शिवराज जालन्याला अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला आहे. वैष्णवी बारावीला असून ती नीट परीक्षेची तयारी करते. प्रणाली नववीला असून, पल्लवी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे हे कुटुंब साक्षीदार नव्हे त्यांना वेळोवेळी कुटुंबातील सदस्यांनी पाठींबा दिला. परंतु, यावेळचे आरक्षण अधिकच चर्चेत आले आहे. लाठीहल्ला, गोळीबार, दाखल होणारे गुन्हे यामुळे कुटुंबियांची चिंता वाढत आहे. शिवाय मनोज जरांगे यांच्या लढ्याचा अभिमान आहे. परंतु, त्यांची खालावणारी प्रकृती कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे शासनाने आरक्षणाचा प्रश्न सकारात्मक दृष्टीने मार्गी लावावा, अशी मागणीही हे कुटुंबिय करीत आहेत.

खूप अभिमान वाटतोगावाकडच्या दोन एकर शेतीतून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझे पती मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. याचा मला अभिमान आहे. बेमुदत उपोषण काळात त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे चिंता वाटत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. याचा मराठा समाजातील गरिब कुटुंबातील मुलांना लाभ होईल.- सुमित्रा जरांगे, पत्नीकोट

वडील भावनिक होतील, म्हणून जात नाहीमाझे वडिल आरक्षणाची लढाई लढत आहेत. अंतरवाली सराटी येथे आंदोलनात जावून त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. परंतु, वडील भावनिक होतील म्हणून जाता येत नाही. त्यांच्या आरोग्याची खूप काळजी वाटते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले तर गरजू कुटुंबातील मुलांना त्याचा लाभ होईल. शासनाने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.- शिवराज जरांगे, मुलगा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाFarmerशेतकरी