शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या...

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 19:45 IST

आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

- अशोक डोरलेअंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण मागील सात दिवसांपासून सुरू आहे. शासनाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतायत याचा अभिमान वाटतो. परंतु, आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील सात दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. लाठीचार्ज, गोळीबार प्रकरणानंतर या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांच्या भावना 'लोकमत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनोज जरंगे यांच्या घरी आजोबा रावसाहेब जरांगे, आजी पर्वती जरंगे, पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज, मुली वैष्णवी, प्रणाली, पल्लवी हे होते. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मनोज जरांगे व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलांचे शिक्षण सुरू असून, शिवराज जालन्याला अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला आहे. वैष्णवी बारावीला असून ती नीट परीक्षेची तयारी करते. प्रणाली नववीला असून, पल्लवी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे हे कुटुंब साक्षीदार नव्हे त्यांना वेळोवेळी कुटुंबातील सदस्यांनी पाठींबा दिला. परंतु, यावेळचे आरक्षण अधिकच चर्चेत आले आहे. लाठीहल्ला, गोळीबार, दाखल होणारे गुन्हे यामुळे कुटुंबियांची चिंता वाढत आहे. शिवाय मनोज जरांगे यांच्या लढ्याचा अभिमान आहे. परंतु, त्यांची खालावणारी प्रकृती कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे शासनाने आरक्षणाचा प्रश्न सकारात्मक दृष्टीने मार्गी लावावा, अशी मागणीही हे कुटुंबिय करीत आहेत.

खूप अभिमान वाटतोगावाकडच्या दोन एकर शेतीतून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझे पती मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. याचा मला अभिमान आहे. बेमुदत उपोषण काळात त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे चिंता वाटत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. याचा मराठा समाजातील गरिब कुटुंबातील मुलांना लाभ होईल.- सुमित्रा जरांगे, पत्नीकोट

वडील भावनिक होतील, म्हणून जात नाहीमाझे वडिल आरक्षणाची लढाई लढत आहेत. अंतरवाली सराटी येथे आंदोलनात जावून त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. परंतु, वडील भावनिक होतील म्हणून जाता येत नाही. त्यांच्या आरोग्याची खूप काळजी वाटते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले तर गरजू कुटुंबातील मुलांना त्याचा लाभ होईल. शासनाने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.- शिवराज जरांगे, मुलगा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाFarmerशेतकरी