शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

अहंकार, मायेचा त्याग केल्यास परमेश्वर प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:23 IST

मनुष्य जीवनात सुख शांती हवी असेल तर अहंकार व मायेचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी हरीचैतन्यानंद महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : मनुष्य जीवनात सुख शांती हवी असेल तर अहंकार व मायेचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी हरीचैतन्यानंद महाराज यांनी केले. त्यांच्या मधुर वाणीतून जाफराबाद येथील आदर्शनगर येथे संगीतमय भागवत कथेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी परिसरातील श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तिसरे पुष्प गुंफताना प. पु. स्वामींनी उपदेश देताना सांगितले की, नरदेह दुर्लभ आहे. तेव्हा या नरदेहाचे कल्याण करायचे तर मानवाने गुरुभक्ती केली पाहिजे, कारण त्याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते. माया, मोह, अहंकार हे परमेश्वर प्राप्तीसाठी फार मोठे अडथळे आहेत. तेव्हा त्यांचा त्याग केला पाहिजे, असे सांगत चांगले कार्य करा यश निश्चित मिळते असे ही ते म्हणाले. कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. शेवटी श्रीमद् भागवत कथेच्या आरतीद्वारे कथेची सांगता झाली.याप्रसंगी परिसरातील भाविक - भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तीन दिवसांपासून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या संगीतमय भागवत कथेमध्ये स्वामीजींनी प्रियावर्त, भरत, अजामेळ, परीक्षित प्रल्हाद हिरण्यकश्यपू यांच्या विविध कथांमधून समाजास सत्संग, गुरूभक्ती, गुरुसेवा, गुरुश्रद्धा या गुणांची आस धरावी तर माया, मोह, अहंकार या दुर्गुणांचा त्याग करावा असा उपदेश त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक