शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

अहंकार, मायेचा त्याग केल्यास परमेश्वर प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:23 IST

मनुष्य जीवनात सुख शांती हवी असेल तर अहंकार व मायेचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी हरीचैतन्यानंद महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : मनुष्य जीवनात सुख शांती हवी असेल तर अहंकार व मायेचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी हरीचैतन्यानंद महाराज यांनी केले. त्यांच्या मधुर वाणीतून जाफराबाद येथील आदर्शनगर येथे संगीतमय भागवत कथेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी परिसरातील श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तिसरे पुष्प गुंफताना प. पु. स्वामींनी उपदेश देताना सांगितले की, नरदेह दुर्लभ आहे. तेव्हा या नरदेहाचे कल्याण करायचे तर मानवाने गुरुभक्ती केली पाहिजे, कारण त्याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते. माया, मोह, अहंकार हे परमेश्वर प्राप्तीसाठी फार मोठे अडथळे आहेत. तेव्हा त्यांचा त्याग केला पाहिजे, असे सांगत चांगले कार्य करा यश निश्चित मिळते असे ही ते म्हणाले. कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. शेवटी श्रीमद् भागवत कथेच्या आरतीद्वारे कथेची सांगता झाली.याप्रसंगी परिसरातील भाविक - भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तीन दिवसांपासून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या संगीतमय भागवत कथेमध्ये स्वामीजींनी प्रियावर्त, भरत, अजामेळ, परीक्षित प्रल्हाद हिरण्यकश्यपू यांच्या विविध कथांमधून समाजास सत्संग, गुरूभक्ती, गुरुसेवा, गुरुश्रद्धा या गुणांची आस धरावी तर माया, मोह, अहंकार या दुर्गुणांचा त्याग करावा असा उपदेश त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक