शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: February 1, 2024 11:46 IST

मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे.

जालना : सग्यासोऱ्यांबाबत अध्यादेश निघाला असून, त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. मुंबईला गेल्यानंतर आम्हाला तो अध्यादेश मिळाला. मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे. तुमचे शब्द त्या कायद्यात घ्यायला, सरकारला सांगू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे आणि आपण ते करू, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश निघाला असून, त्यावर हरकती मागितल्या आहेत. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी १० फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केले जाणार आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्याने गॅझेट घेण्याबाबतची मागणी आहे. साडेतीन महिन्यांपासून सगेसोयऱ्यांबाबतची मागणी आहे. त्यावेळी तुम्हाला योग्य वाटत होते. आता ते मिळाले तर मुंबईला जावून हाती काय पडले अशी विचारणा सोशल मीडियावर केली जात आहे. गोरगरिबांच्या हाताला आरक्षणाच्या कायद्यासाठी लागणारा अध्यादेश लागला. परंतु, त्यांच्या हाताला काही नाही लागले. पद, पैसा नाही लागला. ते आम्ही मिळू देणार नाही. आयुष्यभर तुमचे दुकान बंद. आरक्षणाची नोंद न मिळालेल्यांना आरक्षण मिळणार आहे. आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे आणि आपण ते करू, असेही जरांगे पाटील म्हणाले.

तुम्ही फक्त चष्म्याच्या काचा बदलाओबीसींच्या घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केल्याच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, कोणाच्या घरासमोर केला. ओबीसींची घरे आमचे आहेत. ओबीसी आमच्यात गुलाल घेवून नाचतात. एकदा कायद्याची अंमलबजावणी होवून सग्यासोऱ्यांच्या मार्फत प्रमाणपत्र मिळाले ना तुम्ही महादिवाळी बघा अन् विजयाची महासभा बघा. तुम्हाला खूप बघायचे आहे. चष्म्याच्या काचा बदलीत रहा फक्त. काहीही केले तरी मराठा आरक्षणात जाणार आहे. त्यामुळे भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये वाद लावू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण