शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जगण्याच्या हुंकाराचे साहित्य चिरकाल टिकते - रावसाहेब ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:00 IST

सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशदिनानिमित्त जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेत निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवीसंमेलनाचे उद्घाटन उस्मानाबाद येथील विचारवं प्रा. राजा जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, रमेश देहेडकर, अशोक साबळे, डॉ. सुहास सदाव्रते, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन बोरूडे, विठ्ठल वरपे, परमेश्वर बोरूडे, सचिव कैलास भाले, राम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिकांचे कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनात चला गावाकडं धनी या कवितेतून कवी नारायण खरात यांनी बदलत्या सामाजिक घटनांचा परामर्श मांडला. अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी ‘भीमा कोरेगाव’ या ऐतिहासिक गावाचा संदर्भत देत वास्तवातील घटनांवर परखड भाष्य केले. कवी जीजा जाधव यांनी सादर केलेल्या ‘सोडा रे आता वृत्ती सोडा’ या कवितेतून माणसातील विविध वृत्ती प्रवृत्तीवर विडंबनात्मक भाष्य केले. प्रा. अशोक खेडकर यांनी सादर केलेल्या या दगडाचा ठाव घेतला पाहिजे या कवितेतून ढोंगी वागण्यावर शब्दातून चांगलेच फटकारले.कवीसंमेलनात प्रा. एकनाथ शिंदे, राहुल गवई, साहिल पाटील, सुधाकर चिंधोटे, सुनील लोणकर, प्रा. माधव जाधव, प्रा. मधुकर जाधव, प्रा. बी. जी. श्रीरामे, संजयकुमार सरदार, मनीष पाटील यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर दाते तर आभार डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. डी. एम. जानराव, डॉ. के. जी. सूर्यवंशी, संजय हेरकर, इलियास मोहिओद्दीन, नवनाथ लोखंडे, वंदना भालेराव, किरण कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक