शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जगण्याच्या हुंकाराचे साहित्य चिरकाल टिकते - रावसाहेब ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:00 IST

सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशदिनानिमित्त जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेत निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवीसंमेलनाचे उद्घाटन उस्मानाबाद येथील विचारवं प्रा. राजा जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, रमेश देहेडकर, अशोक साबळे, डॉ. सुहास सदाव्रते, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन बोरूडे, विठ्ठल वरपे, परमेश्वर बोरूडे, सचिव कैलास भाले, राम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिकांचे कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनात चला गावाकडं धनी या कवितेतून कवी नारायण खरात यांनी बदलत्या सामाजिक घटनांचा परामर्श मांडला. अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी ‘भीमा कोरेगाव’ या ऐतिहासिक गावाचा संदर्भत देत वास्तवातील घटनांवर परखड भाष्य केले. कवी जीजा जाधव यांनी सादर केलेल्या ‘सोडा रे आता वृत्ती सोडा’ या कवितेतून माणसातील विविध वृत्ती प्रवृत्तीवर विडंबनात्मक भाष्य केले. प्रा. अशोक खेडकर यांनी सादर केलेल्या या दगडाचा ठाव घेतला पाहिजे या कवितेतून ढोंगी वागण्यावर शब्दातून चांगलेच फटकारले.कवीसंमेलनात प्रा. एकनाथ शिंदे, राहुल गवई, साहिल पाटील, सुधाकर चिंधोटे, सुनील लोणकर, प्रा. माधव जाधव, प्रा. मधुकर जाधव, प्रा. बी. जी. श्रीरामे, संजयकुमार सरदार, मनीष पाटील यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर दाते तर आभार डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. डी. एम. जानराव, डॉ. के. जी. सूर्यवंशी, संजय हेरकर, इलियास मोहिओद्दीन, नवनाथ लोखंडे, वंदना भालेराव, किरण कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक