शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रेशीम कोषाने गाठला शंभर टनाचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:35 IST

प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला असून, याची उलाढाल अडीच कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे. कमी पाण्यात हमखास उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जात असून, तुती लागवडीकडेदेखील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात दहावर्षापासून रेशीम शेतीकडे शेतक-यांना वळविण्यासाठी सिंहाचा वाटा आहे, तो खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचा. त्यांनी दशकभरापूर्वी या रेशीम शेतीचे महत्व शेतक-यांना पटवून दिले. केवळ ते पटवूनच हे विज्ञान केंद्र थांबले नाही, तर तुतीची लागवड कशी करावी या संदर्भात थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यासाठी रेशीम जिल्हा कार्यालयाचीही मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील सिंचनाचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन रेशीम लागवडीकडे शेतक-यांना वळवण्यासाठी मोठे परीश्रम घ्यावे लागले. त्या परिश्रमांचे आज चीज झाल्याचे समाधान शेतक-यांमध्ये दिसून येत आहे.जालना जिल्ह्याला बियाणांची राजधानी म्हणून आधीपासूनच एक मोठी ओळख आहे. त्यात आता रेशीकोषाने आणखी भर घातली आहे. सध्या जिल्ह्यात ६०० एकरपेक्षा अधिक भूभागावर तुतीची लागवड केली जात आहे. त्यातून मिळणा-या रेशीम कोषाला जालना बाजारपेठेत सरासरी ३०० रूपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे.कर्नाटकातील रामगनर येथे देखील जवळपास असेच दर मिळायचे. परंतु तेथे जाण्या-येण्यासाठी वेळ आणि लागणारा खर्च शेतक-यांचा वाचला आहे.बाजारपेठेसाठीचे पाच कोटी पडूनजालन्यात रेशीमकोष खरेदीसाठी हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटी रूपयांची तरतूद दोन वर्षांपासून केली होती. परंतु त्यासाठी जागा आणि प्रारूप आराखडा तयार करण्यातच दोनवर्ष लोटले. शेतक-यांची गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर यांनी रेशीम कोष खरेदीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत जागा उपलब्ध करून देऊन प्रायोगिक तत्त्वावर नऊ महिन्यांपूर्वी ही कोष खरेदी सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.धागानिर्मिती केंद्र बंदजालना जिल्ह्यात रेशीम कोष खरेदीसह कोषापासून रेशीमी धागा निर्मिती केंद्र तत्कालीन मंत्री आ. राजेश टोपे यांनी ५० लाख रूपये खर्च करून घनसावंगी येथे रेशीम धागानिर्मिती केंद्र उभारले होते. मात्र या ना त्या कारणाने हे केंद्र बंद पडले आहे. नंतर त्यांनी पाथरवाला येथेही दोन कोटी रूपये खर्चाचे अत्याधुनिक रेशीम धागा निर्मितीचा प्रस्ताव तयार केला होता. माात्र तो देखील अद्याप कागदावरच आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानही मिळत होते. मात्र अद्याप हे धागा निर्मिती केंद्र सुरू होऊ शकले नाही.

टॅग्स :businessव्यवसायAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार