शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम कोषाने गाठला शंभर टनाचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:35 IST

प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला असून, याची उलाढाल अडीच कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे. कमी पाण्यात हमखास उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जात असून, तुती लागवडीकडेदेखील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात दहावर्षापासून रेशीम शेतीकडे शेतक-यांना वळविण्यासाठी सिंहाचा वाटा आहे, तो खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचा. त्यांनी दशकभरापूर्वी या रेशीम शेतीचे महत्व शेतक-यांना पटवून दिले. केवळ ते पटवूनच हे विज्ञान केंद्र थांबले नाही, तर तुतीची लागवड कशी करावी या संदर्भात थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यासाठी रेशीम जिल्हा कार्यालयाचीही मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील सिंचनाचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन रेशीम लागवडीकडे शेतक-यांना वळवण्यासाठी मोठे परीश्रम घ्यावे लागले. त्या परिश्रमांचे आज चीज झाल्याचे समाधान शेतक-यांमध्ये दिसून येत आहे.जालना जिल्ह्याला बियाणांची राजधानी म्हणून आधीपासूनच एक मोठी ओळख आहे. त्यात आता रेशीकोषाने आणखी भर घातली आहे. सध्या जिल्ह्यात ६०० एकरपेक्षा अधिक भूभागावर तुतीची लागवड केली जात आहे. त्यातून मिळणा-या रेशीम कोषाला जालना बाजारपेठेत सरासरी ३०० रूपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे.कर्नाटकातील रामगनर येथे देखील जवळपास असेच दर मिळायचे. परंतु तेथे जाण्या-येण्यासाठी वेळ आणि लागणारा खर्च शेतक-यांचा वाचला आहे.बाजारपेठेसाठीचे पाच कोटी पडूनजालन्यात रेशीमकोष खरेदीसाठी हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटी रूपयांची तरतूद दोन वर्षांपासून केली होती. परंतु त्यासाठी जागा आणि प्रारूप आराखडा तयार करण्यातच दोनवर्ष लोटले. शेतक-यांची गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर यांनी रेशीम कोष खरेदीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत जागा उपलब्ध करून देऊन प्रायोगिक तत्त्वावर नऊ महिन्यांपूर्वी ही कोष खरेदी सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.धागानिर्मिती केंद्र बंदजालना जिल्ह्यात रेशीम कोष खरेदीसह कोषापासून रेशीमी धागा निर्मिती केंद्र तत्कालीन मंत्री आ. राजेश टोपे यांनी ५० लाख रूपये खर्च करून घनसावंगी येथे रेशीम धागानिर्मिती केंद्र उभारले होते. मात्र या ना त्या कारणाने हे केंद्र बंद पडले आहे. नंतर त्यांनी पाथरवाला येथेही दोन कोटी रूपये खर्चाचे अत्याधुनिक रेशीम धागा निर्मितीचा प्रस्ताव तयार केला होता. माात्र तो देखील अद्याप कागदावरच आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानही मिळत होते. मात्र अद्याप हे धागा निर्मिती केंद्र सुरू होऊ शकले नाही.

टॅग्स :businessव्यवसायAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार