शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

कसे व्हावे आसवांचे व्यवस्थापन..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:38 AM

अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जायकवाडी धरण भरल्यास गोदाकाठच्या ३८ गावांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा आढावा बैठकीत दिला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात गुरूवारी दुपारपर्यंत ६६.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या वरील क्षेत्रातून पाण्याची आवाक वाढली तर जायकवाडी प्रकल्प भरणार असून, त्यानंतर गोदावरी नदीपात्रातून जालना जिल्ह्यात पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी सोडले तर जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बळेगाव येथे पाणी पोहोचेल. तसेच अंबड मधील १७ गावे, घनसावंगी तालुक्यातील १७ व परतूर तालुक्यातील ५ अशा ३८ गावे नदीकाठी असून, पाण्याची आवक वाढली तर या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.ही शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे व प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, स्थानिक संस्था, मित्रमंडळांनीही आपत्ती काळात मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.बैठकीत उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांनी जिल्ह्यात सद्यस्थित आवश्यक शोध व बचाव साहित्य असून प्रशासन धरणांच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच कोणत्याही आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांनी केले. बैठकीस तहसीलदार मनीषा मेने, डॉ. संदीप ढाकणे, नायब तहसीलदार स्नेहा कुहीरे, कोटूरकर, शेडोळकर, बी.के.चंडोळ, डॉ.विलास रोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कामात कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.आपत्ती काळात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, चुकीची माहिती, अफवा पसरवणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.पालकमंत्र्यांच्याही सूचनाजायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, प्रकल्प भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय साथरोग पसरू नयेत यासाठी दक्षता घ्यावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाfloodपूर