शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कसे व्हावे आसवांचे व्यवस्थापन..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:39 IST

अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जायकवाडी धरण भरल्यास गोदाकाठच्या ३८ गावांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा आढावा बैठकीत दिला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात गुरूवारी दुपारपर्यंत ६६.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या वरील क्षेत्रातून पाण्याची आवाक वाढली तर जायकवाडी प्रकल्प भरणार असून, त्यानंतर गोदावरी नदीपात्रातून जालना जिल्ह्यात पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी सोडले तर जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बळेगाव येथे पाणी पोहोचेल. तसेच अंबड मधील १७ गावे, घनसावंगी तालुक्यातील १७ व परतूर तालुक्यातील ५ अशा ३८ गावे नदीकाठी असून, पाण्याची आवक वाढली तर या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.ही शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे व प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, स्थानिक संस्था, मित्रमंडळांनीही आपत्ती काळात मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.बैठकीत उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांनी जिल्ह्यात सद्यस्थित आवश्यक शोध व बचाव साहित्य असून प्रशासन धरणांच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच कोणत्याही आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांनी केले. बैठकीस तहसीलदार मनीषा मेने, डॉ. संदीप ढाकणे, नायब तहसीलदार स्नेहा कुहीरे, कोटूरकर, शेडोळकर, बी.के.चंडोळ, डॉ.विलास रोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कामात कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.आपत्ती काळात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, चुकीची माहिती, अफवा पसरवणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.पालकमंत्र्यांच्याही सूचनाजायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, प्रकल्प भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय साथरोग पसरू नयेत यासाठी दक्षता घ्यावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाfloodपूर