शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज माफ कसं होतंय?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:46 IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.

शेगाव- देशात आज भाजपानं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.

७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे. या प्रवासात अनेक राज्यातून येत मी महाराष्ट्रात पोहोचलो आहे. तिरस्काराने कधीही या देशाला फायदा झाला नाही, प्रेमानेच देश पुढे जातो. कुटुंबात द्वेष पसरवल्यानंतर कुटुंबाचं भलं होत नाही. मग, देशात द्वेषाचं राजकारण केल्यानंतर देशाला फायदा होईल का? असे म्हणत राहुल गांधींनी उपस्थित जनसमुदायालाच सवाल केला. 

देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत असून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, युवकांना रोजगार मिळत नाही. पण उद्योगपतींचे हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातंय, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. तसेच भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी संवाद साधतोय. पण, मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलोय. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार