शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

जालन्यात उन्हात पघळतोय गूळ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:16 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये गुळ खरेदी- विक्री व्यवहारासाठी शेड नसल्याने सर्व व्यवहार उन्हातच करावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे गुळाच्या भेल्या पघळत असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये गुळ खरेदी- विक्री व्यवहारासाठी शेड नसल्याने सर्व व्यवहार उन्हातच करावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे गुळाच्या भेल्या पघळत असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.मराठवाड्यातील लातूरनंतर जालना येथील गूळ मार्केट मोठे आहे. नांदेड, लातूर, औरंगाबादच्या काही तालुक्यातून येथील गूळ मार्केटमध्ये गुळाची आवक होत आहे. सध्या गुळाचा हंगाम सुरू आहे. गूळ बाजारात सध्या दहा ते पंधरा हजार गुळाच्या भेल्याची आवक आहे. मात्र आलेला शेतक-यांचा माल उतरविण्यासाठी गूळ बाजारात शेड नसल्याने गैरसोय सुरू आहे. गूळ खरेदी विक्रीसाठी बांधण्यात आलेले शेडमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. यामुळे गूळ बाजारात आलेला माल कडक उन्हातच उतरून मोजमाप करावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही वर्षापूर्वी गूळ मार्केट समोर असलेल्या गोदामात गूळ खरेदी विक्रीचे व्यवहार होत. मात्र बाजार समितीने सदर गोदामात शेतक-यांचा तारण ठेवलेला शेतमाला ठेवण्यास येत आहे. तेव्हापासून गूळ व्यापा-यांची चांगलीच गैरसोय सुरू आहे. गूळ व्यापा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीने गूळ मार्केट परिसरातच गूळ खरेदी विक्रीसाठी मोठे शेड उभारून दिले होते.मात्र शेड चारही बाजूने खुले असल्याने खरेदी विक्रीसाठी अडचणीचे ठरत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. ज्या परिसरात गूळ व्यापा-यांची दुकाने आहेत. त्याच ठिकाणी शेड उभारून उन्हाळ्यात व्यापा-यांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी गूळ व्यापा-यांसह खरेदीदारांनी केली आहे.दिवसेदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. गुळाचा हंगाम असल्याने नियमित बाजारात पंधरा ते वीस हजार भेल्या गूळ मार्केटमध्ये येत आहे. मात्र गुळाची खरेदी विक्री व्यवहार भर उन्हातच करावे लागत असल्याने गुळ पघळून गुळाचे नुकसान होत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी गुळाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकच्या ताडपत्रीचा वापर करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीTemperatureतापमानMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र