शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

डोक्याला मार तरी १९ कि.मी चालविली दुचाकी; उपचारासाठी औरंगाबाद येथे जाताना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST

फकिरा देशमुख भोकरदन : शेतीच्या वादातून काका व चुलत भावांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर कौतिक गावंडे यांनी कशीबशी सुटका ...

फकिरा देशमुख

भोकरदन : शेतीच्या वादातून काका व चुलत भावांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर कौतिक गावंडे यांनी कशीबशी सुटका करून १९ किलोमीटर दुचाकी चालवीत भोकरदन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी उपचारासाठी पाठविले. उपचार घेऊन पुन्हा पोलीस ठाणे गाठले; परंतु तक्रार करून औरंगाबाद येथे जात असताना काळाने घाला घातल्याने गावंडे यांचा मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शनिवारी सायंकाळी घडली.

कोळेगाव येथील गावंडे कुटुंबात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शेतीच्या वादातून भांडण सुरू होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कौतिक गावंडे हे गोद्री रोडवरील गट क्रमांक १९५ मधील गव्हाच्या पिकाला पाणी देत होते. त्याचवेळी काका सुखदेव सारजूबा गावंडे व चुलत भाऊ सुधाकर गावंडे, परमेश्वर गावंडे हे त्यांच्याकडे गेले व तू आमच्याकडे रागाने का बघतोस म्हणत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी डोक्यात फावडे व दगड मारून डोके फोडले. त्यांनी आरोपींच्या तावडीतून सुटका करून डोक्याला मार लागलेला असतानाही १९ किलोमीटर दुचाकी चालवून भोकरदन पोलीस ठाणे गाठले. पोलीस कर्मचारी श्रीकांत केंद्रे यांनी गावंडे यांना रुग्णालयात पाठविले. भोकरदन येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना जालना येथे रेफर केले; परंतु गावंडे हे जालना येथे न जाता सिल्लोड येथे गेले. उपचार घेऊन त्यांनी रग्णवाहिकेने रात्री १० वाजता पुन्हा भोकरदन पोलीस ठाणे गाठले. तक्रार देताना त्यांना उलटी झाली. पोलिसांनी त्यांना औरंगाबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. औरंगाबादकडे जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री कोळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले. तीनपैकी एक आरोपी सुखदेव गावंडे हे सुद्धा जखमी असल्याने त्यांच्यावर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पगार मिळण्यापूर्वीच खून

कौतिक गावंडे यांना दोन भाऊ आहेत. एक भाऊ भोकरदन येथे राहतो, तर दुसरा पुण्यात वास्तव्याला आहे. गावंडे ११ वर्षांपासून जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील एका खासगी संस्थेवर कार्यरत होते. त्यांना पगार सुरू नव्हता. काही दिवसांपूर्वीच त्यांना २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. त्यांना पगारही सुरू होणार होता; परंतु पगार मिळण्यापूर्वीच त्यांचा खून झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.