शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

उच्च दाब वीज ग्राहकांना दहा टक्के दरवाढीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:44 AM

वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महिन्याला बसणार आहे.

ठळक मुद्देजालना : मंदीत असलेल्या उद्योगांना आर्थिक भूर्दंड, वीज नियमक आयोगाने दरवाढीचा पुनर्विचार करावा, २०२० नंतरचे टेरीफ दर जाहीर

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महिन्याला बसणार आहे.वीज नियामक आयोगाने वेळावेळी जनसुनवाणी घेऊन उद्योजक, आणि उर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना यावेळी निमंत्रीत केले होते. यावेळी उद्योजकांनी कुठलीही दरवाढ करू नये असे म्हणणे मांडले होते. परंतु, याकडे आयोगाने लक्ष दिले नसल्याचे वास्तव आहे. एक तारखेपासून लागू केलेल्या दरवाढीवरून दिसून येते.दोन वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील उच्चदाब वीज वापर ग्राहकांना प्रति युनिटप्रमाणे एक रूपयांची सवलत दिली होती.ही सवलत आता केवळ नावापुरती उरली आहे. एक सप्टेंबर पासून जी दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे पूर्वी ४.५० पैसे प्रति युनिट दर आकारले जात होते. तर आता हे दर प्रतियुनिट थेट ५. १० पैसे असे करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास वीज वितरण कंपनीला या उच्चदाब वीज ग्राहकांकडून दर महिन्याला ७० कोटी रूपये मिळत असत. यात आता वाढ होऊन साधारपणे ८० कोटी रूपयांवर हे वीजबिल पोहचणार आहे.या दरवाढीचा सर्वात मोठा फटका स्टील, डाळमिल, आॅईलमिल, साखर कारखाने आदींना बसणार असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत जालना जिल्ह्याचा वीज वितरण कंपनीचा डोलारा पूर्णपणे या उच्चदाब वीज ग्राहकांकडून मिळणाऱ्या वीजबिलातून चालू आहे. घरगुती वीज वापर आणि व्यावयसायिक वीज ग्राहकांकडून दर महिन्याला संपूर्ण जिल्ह्यातून केवळ अडीच कोटी रूपये मिळतात.वीज दरवाढीचा फेरविचार करावासध्या उद्योग, व्यवसायात कमी पाऊस पडल्याने मोठी मंदी आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने ही दरवाढ केली आहे. ती दरवाढ मागे घेऊन या दरवाढीचा फेरविचार केल्यास उद्योगांना त्याचा लाभ होऊ शकतो. आम्ही नियमितपणे वीजबिल भरत असतांना आमच्यावरच ही दरवाढ लादली आहे. या सदंर्भात वीज नियामक आयोगाकडे पत्र व्यवहार करणार आहोत.- गणेश बियाणी, अध्यक्ष लघू उद्योग भारती संघटना

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण