शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

दमदार पावसाने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:25 IST

आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८८.९८ टक्क्यांवर शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी

जालना : यंदा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. परिणामी  जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण ८८.९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, आगामी काळातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रबी हंगामात शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेवटच्या टप्प्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी वाहिले. परिणामी जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर चार प्रकल्पात अद्यापही मृत पाणीसाठा असून, चार प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. पाच प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सहा प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील कल्याण गिरजा, कल्याण मध्यम, अप्पर दुधना, जुई, धामना, जिवरेखा, गल्हाटी हे सातही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

मध्यम प्रकल्पांची स्थिती पाहता जालना तालुक्यातील दरेगाव, जामवाडी, नेर, वाकी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर, पिंपळकाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव,  रेलगाववाडी,  जाफराबाद तालुक्यातील कोनड, भारज, चिंचखेडा, शिंदी, अंबड तालुक्यातील डावरगाव, रोहिलागड, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी,  टाका, लासुरा हे प्रकल्प भरले आहेत. तर घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, म. चिंचोली, दहेगाव, बोररांजणी, परतूर तालुक्यातील नागथस, बामणी, मंठा तालुक्यातील पांगरी, पोखरी, पिंपरखेडा, शिरपूर, सारवाडी, दहा, वाई आदी प्रकल्प तुडूंब भरले आहेत. दरम्यान, गत अनेक वर्षानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून वापर होणे गरजेचे आहे.

लघु प्रकलपात ८४.४ टक्के साठाजिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ८४.४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सात मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. एकूणच मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसJalanaजालना