शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दमदार पावसाने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:25 IST

आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८८.९८ टक्क्यांवर शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी

जालना : यंदा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. परिणामी  जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण ८८.९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, आगामी काळातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रबी हंगामात शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेवटच्या टप्प्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी वाहिले. परिणामी जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर चार प्रकल्पात अद्यापही मृत पाणीसाठा असून, चार प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. पाच प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सहा प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील कल्याण गिरजा, कल्याण मध्यम, अप्पर दुधना, जुई, धामना, जिवरेखा, गल्हाटी हे सातही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

मध्यम प्रकल्पांची स्थिती पाहता जालना तालुक्यातील दरेगाव, जामवाडी, नेर, वाकी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर, पिंपळकाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव,  रेलगाववाडी,  जाफराबाद तालुक्यातील कोनड, भारज, चिंचखेडा, शिंदी, अंबड तालुक्यातील डावरगाव, रोहिलागड, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी,  टाका, लासुरा हे प्रकल्प भरले आहेत. तर घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, म. चिंचोली, दहेगाव, बोररांजणी, परतूर तालुक्यातील नागथस, बामणी, मंठा तालुक्यातील पांगरी, पोखरी, पिंपरखेडा, शिरपूर, सारवाडी, दहा, वाई आदी प्रकल्प तुडूंब भरले आहेत. दरम्यान, गत अनेक वर्षानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून वापर होणे गरजेचे आहे.

लघु प्रकलपात ८४.४ टक्के साठाजिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ८४.४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सात मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. एकूणच मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसJalanaजालना