शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:25 IST

आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८८.९८ टक्क्यांवर शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी

जालना : यंदा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. परिणामी  जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण ८८.९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, आगामी काळातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रबी हंगामात शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेवटच्या टप्प्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी वाहिले. परिणामी जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर चार प्रकल्पात अद्यापही मृत पाणीसाठा असून, चार प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. पाच प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सहा प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील कल्याण गिरजा, कल्याण मध्यम, अप्पर दुधना, जुई, धामना, जिवरेखा, गल्हाटी हे सातही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

मध्यम प्रकल्पांची स्थिती पाहता जालना तालुक्यातील दरेगाव, जामवाडी, नेर, वाकी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर, पिंपळकाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव,  रेलगाववाडी,  जाफराबाद तालुक्यातील कोनड, भारज, चिंचखेडा, शिंदी, अंबड तालुक्यातील डावरगाव, रोहिलागड, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी,  टाका, लासुरा हे प्रकल्प भरले आहेत. तर घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, म. चिंचोली, दहेगाव, बोररांजणी, परतूर तालुक्यातील नागथस, बामणी, मंठा तालुक्यातील पांगरी, पोखरी, पिंपरखेडा, शिरपूर, सारवाडी, दहा, वाई आदी प्रकल्प तुडूंब भरले आहेत. दरम्यान, गत अनेक वर्षानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून वापर होणे गरजेचे आहे.

लघु प्रकलपात ८४.४ टक्के साठाजिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ८४.४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सात मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. एकूणच मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसJalanaजालना