शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारावर कर्णबधिरांना दीड वर्षापासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:32 IST

जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५२ कर्णबधिरांना गत दीड वर्षांपासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५२ कर्णबधिरांना गत दीड वर्षांपासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा आहे. विशेषत: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून श्रवण यंत्राचे होणारे वाटपही बंद झाल्याने गरजू रूग्णांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.जन्मत: येणारा कर्णबधिरपणा किंवा इतर विविध कारणांनी येणारा कर्णबधिरपणा असो; या आजाराने ग्रासलेले अनेक रूग्ण जालना जिल्ह्यात आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार जागतिक लोकसंख्येच्या ६.१ टक्के नागरिकांना कर्णबधिरपणाचा आजार जडलेला आहे. या आजाराच्या रूग्णांची संख्या जालना जिल्ह्यातही कमी नाही. जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयांमध्ये झालेली तपासणी आणि शिबिरांमधून हजारो रूग्णांना कर्णबधिरपणा आढळून आला आहे. जिल्हा रूग्णालयात शासकीय योजनेतून सन २०१४ मध्ये केवळ १६० श्रवणयंत्र आले होते. हे श्रवणयंत्रणही शालेय मुलांमध्ये आजार आढळून आला तर त्यांना वाटप करण्यासाठी देण्यात आले होते.जिल्हा रूग्णालयातील तपासणीनंतर एखाद्याला श्रवण यंत्राची गरज असेल तर त्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत असलेल्या खासगी रूग्णालयात पाठविले जात असे. तेथे रेशन कार्ड, आधारकार्डसह महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतर रूग्णांना मोफत श्रवणयंत्र मिळत होते. मात्र, गत काही महिन्यांपासून खाजगी रूग्णालयातून श्रवणयंत्र वाटप होणेही बंद झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कर्णबधिरांना हजारो रुपये खर्च करून श्रवणयंत्र खरेदी करावे लागत आहे. कर्णबधिरांची होणारी गैरसोय पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याकडे लक्ष देऊन शासकीय योजनेतून पूर्वीप्रमाणे श्रवणयंत्राचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.विमा कंपनीच्या पथकाने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील श्रवणयंत्र वाटप करणाऱ्या खाजगी रूग्णालयाची तपासणी केली होती. या तपासणीनंतर श्रवणयंत्र वाटप बंद करण्यात आले आहे.मात्र, श्रवणयंत्र वाटप का बंद करण्यात आले, या प्रश्नाचे उत्तर मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे शोधूनही मिळत नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून श्रवणयंत्र वाटप बंद कोणत्या कारणाने करण्यात आले, याचाही शोध घेण्याची गरज असल्याची मागणी रूग्णांसह नातेवाईकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगMedicalवैद्यकीयHealthआरोग्य