शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

एक हजारावर कर्णबधिरांना दीड वर्षापासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:32 IST

जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५२ कर्णबधिरांना गत दीड वर्षांपासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५२ कर्णबधिरांना गत दीड वर्षांपासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा आहे. विशेषत: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून श्रवण यंत्राचे होणारे वाटपही बंद झाल्याने गरजू रूग्णांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.जन्मत: येणारा कर्णबधिरपणा किंवा इतर विविध कारणांनी येणारा कर्णबधिरपणा असो; या आजाराने ग्रासलेले अनेक रूग्ण जालना जिल्ह्यात आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार जागतिक लोकसंख्येच्या ६.१ टक्के नागरिकांना कर्णबधिरपणाचा आजार जडलेला आहे. या आजाराच्या रूग्णांची संख्या जालना जिल्ह्यातही कमी नाही. जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयांमध्ये झालेली तपासणी आणि शिबिरांमधून हजारो रूग्णांना कर्णबधिरपणा आढळून आला आहे. जिल्हा रूग्णालयात शासकीय योजनेतून सन २०१४ मध्ये केवळ १६० श्रवणयंत्र आले होते. हे श्रवणयंत्रणही शालेय मुलांमध्ये आजार आढळून आला तर त्यांना वाटप करण्यासाठी देण्यात आले होते.जिल्हा रूग्णालयातील तपासणीनंतर एखाद्याला श्रवण यंत्राची गरज असेल तर त्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत असलेल्या खासगी रूग्णालयात पाठविले जात असे. तेथे रेशन कार्ड, आधारकार्डसह महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतर रूग्णांना मोफत श्रवणयंत्र मिळत होते. मात्र, गत काही महिन्यांपासून खाजगी रूग्णालयातून श्रवणयंत्र वाटप होणेही बंद झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कर्णबधिरांना हजारो रुपये खर्च करून श्रवणयंत्र खरेदी करावे लागत आहे. कर्णबधिरांची होणारी गैरसोय पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याकडे लक्ष देऊन शासकीय योजनेतून पूर्वीप्रमाणे श्रवणयंत्राचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.विमा कंपनीच्या पथकाने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील श्रवणयंत्र वाटप करणाऱ्या खाजगी रूग्णालयाची तपासणी केली होती. या तपासणीनंतर श्रवणयंत्र वाटप बंद करण्यात आले आहे.मात्र, श्रवणयंत्र वाटप का बंद करण्यात आले, या प्रश्नाचे उत्तर मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे शोधूनही मिळत नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून श्रवणयंत्र वाटप बंद कोणत्या कारणाने करण्यात आले, याचाही शोध घेण्याची गरज असल्याची मागणी रूग्णांसह नातेवाईकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगMedicalवैद्यकीयHealthआरोग्य