शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

एक हजारावर कर्णबधिरांना दीड वर्षापासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:32 IST

जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५२ कर्णबधिरांना गत दीड वर्षांपासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५२ कर्णबधिरांना गत दीड वर्षांपासून श्रवण यंत्राची प्रतीक्षा आहे. विशेषत: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून श्रवण यंत्राचे होणारे वाटपही बंद झाल्याने गरजू रूग्णांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.जन्मत: येणारा कर्णबधिरपणा किंवा इतर विविध कारणांनी येणारा कर्णबधिरपणा असो; या आजाराने ग्रासलेले अनेक रूग्ण जालना जिल्ह्यात आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार जागतिक लोकसंख्येच्या ६.१ टक्के नागरिकांना कर्णबधिरपणाचा आजार जडलेला आहे. या आजाराच्या रूग्णांची संख्या जालना जिल्ह्यातही कमी नाही. जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयांमध्ये झालेली तपासणी आणि शिबिरांमधून हजारो रूग्णांना कर्णबधिरपणा आढळून आला आहे. जिल्हा रूग्णालयात शासकीय योजनेतून सन २०१४ मध्ये केवळ १६० श्रवणयंत्र आले होते. हे श्रवणयंत्रणही शालेय मुलांमध्ये आजार आढळून आला तर त्यांना वाटप करण्यासाठी देण्यात आले होते.जिल्हा रूग्णालयातील तपासणीनंतर एखाद्याला श्रवण यंत्राची गरज असेल तर त्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत असलेल्या खासगी रूग्णालयात पाठविले जात असे. तेथे रेशन कार्ड, आधारकार्डसह महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतर रूग्णांना मोफत श्रवणयंत्र मिळत होते. मात्र, गत काही महिन्यांपासून खाजगी रूग्णालयातून श्रवणयंत्र वाटप होणेही बंद झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कर्णबधिरांना हजारो रुपये खर्च करून श्रवणयंत्र खरेदी करावे लागत आहे. कर्णबधिरांची होणारी गैरसोय पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याकडे लक्ष देऊन शासकीय योजनेतून पूर्वीप्रमाणे श्रवणयंत्राचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.विमा कंपनीच्या पथकाने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील श्रवणयंत्र वाटप करणाऱ्या खाजगी रूग्णालयाची तपासणी केली होती. या तपासणीनंतर श्रवणयंत्र वाटप बंद करण्यात आले आहे.मात्र, श्रवणयंत्र वाटप का बंद करण्यात आले, या प्रश्नाचे उत्तर मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे शोधूनही मिळत नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून श्रवणयंत्र वाटप बंद कोणत्या कारणाने करण्यात आले, याचाही शोध घेण्याची गरज असल्याची मागणी रूग्णांसह नातेवाईकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगMedicalवैद्यकीयHealthआरोग्य