शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:28 IST

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार

ठळक मुद्देचार वाजता सुटणारी शाळा साडेतीन वाजताच सोडून दिली.मुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

तळणी (जि. जालना) :  रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.  या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

कोकरंबा येथे इयत्ता १ ते ५ वी पर्यंत वर्ग असून, ४१ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एन.व्ही. आघाव यांच्यासह दोन शिक्षकाची शाळेत नियुक्ती आहे.  मुख्याध्यापक एन. व्ही आघाव हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथून अपडाऊन करतात. रजा न टाकताच शाळेत गैरहजर राहणे, शाळेच्या वेळेत न येणे इ. तक्रारींमुळे मुख्याध्यापकासह शिक्षक  नेहमीच चर्चेत असतात.  गुरूवारी दोन्ही शिक्षक तळणी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. यामुळे मुख्याध्यापक आघाव हे एकटेच शाळेत होते. 

साडेतीन वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आले आणि रिमझिम पाऊसही सुरु झाला. त्यामुळे लोणार येथे जाण्यास अडचण येईल. त्यातच रेनकोटही घरीच राहिल्याने मुख्याध्यापक आघाव यांनी चार वाजता सुटणारी शाळा साडेतीन वाजताच सोडून दिली. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

कारवाई करणारयापूर्वी सुद्धा मुख्याध्यापक एन. व्ही. आघाव हे रजा न टाकताच वैद्यकीय रजेवर गेले होते. याबाबत त्यांना नोटीस पाठविली होती. त्याचा खुलासा अद्यापही आलेला नाही. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच शाळेतून सोडून देणे ही गंभीर बाब आहे. याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल असे  केंद्रप्रमुख एस. यू. वाघ यांनी सांगितले.

 माझा रेनकोट घरी राहिल्याने पावसात घरी जाण्यास अडचण आली असती यामुळे विद्यार्थ्यांना सोडून दिले.- एन.व्ही. आघाव, मुख्याध्यापक 

टॅग्स :Rainपाऊसzp schoolजिल्हा परिषद शाळाJalanaजालनाTeacherशिक्षक