शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

घनसावंगी मतदार संघातील शेती, वीज, सिंचनासह इतर क्षेत्रात भरीव कामे केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:35 IST

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देराजेश टोपे : कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती

जालना / तीर्थपुरी : गोदावरी नदीवर चार बॅरेजेस बांधले. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. आपण केलेल्या जलसंधारणाच्या इतर कामांचाही शेतीला लाभ होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, अविनाश धायगुडे, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, ज्ञानदेव मुळे, तात्यासाहेब उढाण, महेंद्र पवार, जयमंगल जाधव, तात्यासाहेब चिमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. टोपे म्हणाले, तीर्थपुरी परिसरातील शेतक-यांसाठी साखर कारखानदारी निर्माण केली. त्यासाठी गोदावरीवर चार बॅरेजेस बांधले. त्यामधून पाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी लागणारी वीज निर्माण करून दिली. विजेसाठी मोठ्या प्रमाणात ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण केले. एवढ्यावर न थांबता १३२ केव्ही उपकेंद्र तीर्थपुरीसाठी मंजूर केले. सिंचनाचे काम मोठ्या प्रमाणात झाले. तीर्थपुरीच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, येथील महाविद्यालयाची इमारत उभी करून त्यामधून गरजून मुलांना सर्व शाखेचे शिक्षण दिले जाते. यामधून कौशल्य विकास केंद्र सुरू करून बेरोजगारांना रोजगार किंवा नोकरी मिळण्याचे काम येत्या सहा महिन्यात केले जाणार आहे. विरोधी उमेदवार गुत्तेदारीसाठी राजकारण करीत असून, मतदारांनी भूलथापांना न भूलता विकास कामांसाठी पुन्हा एकदा विधानसभेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे