शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोरोनाचा कहर, जिल्ह्यात १९२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

जालना : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, बुधवारी तब्बल १९२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेषत: यात ...

जालना : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, बुधवारी तब्बल १९२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेषत: यात जालना शहरातीलच १०९ जणांचा समावेश आहे. कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचाही बुधवारी मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यातील तीन दिवसांत ही रुग्णसंख्या शंभरावर राहिली आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल १९२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातीलच तब्बल १०९ जणांचा समावेश आहे. तालुक्यातील अहंकार देऊळगाव- १, नेर- १, भाटेपुरी- १, कार्ला- १, वखारी- १, पीर पिंपळगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहरातील एक, वाई येथील एक व तळणी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर शहरातील एकाला बाधा झाली आहे. घनसावंगी शहरातील एक, भुतेगाव - १, कुंभार पिंपळगाव- ३, राजाटाकळी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबड शहरातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर भराडी - १, कवडगाव - १, जोगेश्वरवाडी-१, महाकाळा - १, बदनापूर शहर - १, शेलगाव - ४, चितोडा - १, कंडारी-१ व आन्वी येथील एकाला बाधा झाली आहे. जाफराबाद शहरातील दोन, वरूड- २, किन्होळा- १, गोंदखेडा- १, कुंभारझरी- १, टेंभुर्णी - २, निमखेडा- १ व माहोरा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भोकरदन शहर- ३, फत्तेपूर - १, लेह - १, बरंजळा लोखंडे -१, कोडोली - १, आलापूर - २, जवखेडा - १, मोहलाई - १, लोणगाव - २, चांदई येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील ११, परभणी जिल्ह्यातील ४ व औरंगाबादेतील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

१२१ जण कोरोनामुक्त

कोविड रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर १२१ जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ हजार ८९८ वर गेली असून, त्यातील ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर यशस्वी उपचारांनंतर १४ हजार ६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

अलगीकरणात ३१ जण

जिल्ह्यातील दोन संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ३१ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील वन प्रशिक्षण केंद्रात २४ जणांना व घनसावंगी येथील मुलींच्या वसतिगृहात सातजणांना ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांची नियमित तपासणी करून औषधोपचार केले जात असल्याचे सांगण्यात आले.