शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परराज्यांत हसनाबादच्या सेंद्रिय पेरूची गोडी; पहिली खेप गुजरातला रवाना

By शिवाजी कदम | Updated: August 9, 2023 16:31 IST

ळ लागवडीपासून ते तोडणीपर्यंत त्यांनी योग्य निगा राखल्यामुळे एका फळाचे वजन ५०० ते ७०० ग्राम एवढे आले आहे.

हसनाबाद : जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे मनोज लाठी या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. लाठी यांनी पाच एकर पडीत जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग फुलवून त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या बागेतील पेरूची पहिली खेप गुजरात राज्यातील सुरत येथे रवाना झाली असून, २३ टन माल पाठवण्यात आला आहे. आणखी २०० टन माल परराज्यातील शहरांत पाठविण्यात येणार आहे.

येथील शेतकरी मनोज लाठी यांनी शिवारात पाच एकर शेती आहे. मात्र २०१७ मध्ये ती शेती पडीत होती. मात्र, पारंपरिक पिकांऐवजी फळबाग लावण्याचा निर्णय लाठी यांनी घेतला. त्यांनी सहा वर्षांपूर्वी व्हीएनआर जातीची १ हजार पेरूच्या झाडांची बाग लावली. त्यांनी या जातीची रोपे छत्तीसगड येथून मागवले होते.

सेंद्रिय फळांना मागणीरासायनिक औषधांचा वापर करून पिकवलेल्या फळांपेक्षा सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या फळांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे मनोज लाठी यांना समजले. त्यांनी छत्तीसगड येथून साठ रुपये याप्रमाणे रोपे मागवली. मनाेज लाठी यांचे बंधू दिलीप लाठी हे पुणे येथे राहतात. त्यांनी मनोज लाठी यांना पेरूच्या फळबागीविषयी मार्गदर्शन केले. लाठी यांनी पेरू लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे फळाचा दर्जा उत्तम राखण्यात त्यांना यश आले आहे. त्यांचा मुलगा प्रफुल्ल लाठी याची त्यांना मोलाची साथ मिळाली.

दोनशे टन उत्पादनाची अपेक्षाकोणतेही रसायनिक खत न वापरता शेणाची सलरी, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क वापरून त्यांनी आपली फळबाग जोपासली आहे. पेरूच्या उत्पादनातून त्यांना सुमारे दोनशे टन उत्पादनाची अपेक्षा आहे. फळ लागवडीपासून ते तोडणीपर्यंत त्यांनी योग्य निगा राखल्यामुळे एका फळाचे वजन ५०० ते ७०० ग्राम एवढे आले आहे. फळ दीर्घकाळ टिकण्यासाठी आकर्षक पॅकिंग केल्यामुळे अनेक ठिकाणांहून ऑर्डर मिळू लागल्या आहेत.

शेतात पाहणीशासनाच्या महात्मा फुले स्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे व्यवस्थापक गणेश चौधरी यांनी मनोज लाठी यांच्या पेरूबागेची पाहणी केली. दुष्काळीस्थिती असूनही योग्य नियोजन करून त्यांनी फळबाग जोपासली आहे. चोख हिशोब ठेवल्याने तोट्यात जाणारा शेती व्यवसाय त्यांनी नफ्यात आणून दाखवला आहे. याची दखल घेऊन फळबागेची पाहणी केली असल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले.

कर्नाटकातून मागणीसेंद्रिय पेरूला देशातील विविध भागांमध्ये मोठी मागणी आहे. मनोज लाठी यांनादेखील विविध शहरांमधून ऑर्डर येत आहेत. पहिली खेप सुरतकडे रवाना झाल्यानंतर येत्या काही दिवसांत बेंगळुरूसह उत्तर प्रदेशात पेरू पाठवणार असल्याचे मनोज लाठी यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना