शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गाव कारभाऱ्यांचेच हात गैरव्यवहाराने बरबटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:43 IST

चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावाचा विकास करण्यासाठी ज्यांना सरपंच बनविले त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटत असल्याचे चित्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाखल होणा-या तक्रारींवरून दिसून येते. चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे. यात शासकीय निधीतील अपहाराच्या तक्रारींचा भरणा असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गावाचा कारभार हाकण्यासाठी सरपंचांची निवड केली जाते. शासन निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडले जात आहेत. सरपंच पदावर बसलेल्या व्यक्तीने विकास कामे करून ग्रामस्थांना मुलभूत सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. यात राज्य सरकारने १४ व्या वित्त आयोगांतर्गत सर्व निधी हा थेट ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १४ वित्त आयोगाचा सर्वच निधी हा थेट ग्रामपंचायत कार्यालयाला जमा होतो. या निधीतून गावात विविध विकास करणे गरजे असते. मात्र, ‘खुर्ची’त बसलेल्या काही सरपंचांनी शासकीय नियमांनाच धाब्यावर बसवून कामकाज केल्याचे चित्र आहे. अशा सरपंचांचे पितळ उघडे पाडण्याचे काम विरोधी सदस्य करीत आहेत.मागील वर्षभरात १४ व्या वित्त आयोगाच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिका-यांकडे आल्या आहे. भ्रष्टाचारासह तिसरे अपात्य न दाखवणे, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर तक्रारी जिल्हाधिका-यांकडे दाखल झाल्या होत्या. दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हाधिका-यांनी आजवर ३० सरपंचांना अपात्र ठरवले आहे. दरम्यान, इतर काही ग्रामपंचायतीच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत.जिल्हाधिका-यांकडे धडकल्या ४० तक्रारीतिसरे आपत्य न दाखवणे, आर्थिक लाभ, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर कारणावरुन जिल्हाधिका-यांकडे ४० तक्रारी आल्या होत्या. चौकशीनंतर ३० सरपंचांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.या गावच्या सरपंचांवर झाली कारवाईजानफेळ, आनंदवाडी, मांडवा, आंबा, भारज खुर्द, लतीफपूर, कंडारी खु. रोषनगाव, श्रीकृष्णनगर यासह इतर गावातील सरपंच व डोल्हारा या गावातील उपसरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वरुड बु. सुखापुरी, भाटेपुरी, मोहपुरी येथील सदस्यांवर विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर अनेकांनी पुढील न्यायालयीन लढाईही सुरू ठेवली असून, तेथील निकाल कोणाच्या बाजुने लागणार याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चाही सुरू असतात.

टॅग्स :sarpanchसरपंचcollectorजिल्हाधिकारीCorruptionभ्रष्टाचार