शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:40 IST

५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. विशेषकरुन महिलांची पाण्याविना मोठ तारांबळ उडत आहे. पाणी टंचाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.गावात ग्रामपंचायत मालकीच्या तीन विहिरी तसेच दोन बोअर आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिमुळे विहिर आणि बोअरची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे एक महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा विकस्ळीत झाला आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने असतांना मात्र, याकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चौदावा वित्त आयोग, कर वसूली, गाळ्याचे भाडे, तसेच आठवडी बाजाराच्या हर्राशीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र असे असतांनाही पाणी समस्यावर ग्रामपंचात प्रशासन कानाडोळा करत आहे. पाण्याविना गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांन निवेदन देऊन गावात टँकरणे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.मात्र अद्यापही टँकर सुरु करण्यात आला नाही. यामुळे संतप्त ५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला. पाणी पुरवठा पूर्ववत करा अन्यथा यापेंक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येणार असल्याचे महिलांनी ग्रामसेवकाला फैलावर घेतले.यावेळी सूबाबाई राखुंडे,बबिता राखुंडे,वंदना पटेकर,मनीषा तोडकर, लता पाटील, सखु राखुंडे,आशाबी शेख, करिमा कुरेशी, विमल खरात, मथुरा नरवडे, नंदा सोनवणे सह आदी महिलांनी सरपंच जैतूनबी बागवान व उपसरपंच शोभा पटेकर व ग्रामविकास अधिकारी एन.एम मंदोडे यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMorchaमोर्चाWomenमहिला