शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

अडीच लाख मुले करणार मतदारांची जनजागृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:52 IST

मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हातील पाचही विधानसभा मतदार संघात २१ आक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली.दीपाली मोतीयाळे म्हणाल्या, जिल्हास्तरावरावरुन तालुकानिहाय संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आपल्या अधिनस्त शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या मार्फत ते शाळा शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्फत ते मुलांद्वारे ते पालकांपर्यंत पोहचविले जाणार आहेत. त्यानंतर पालक म्हणजेच मतदार त्या संकल्प पत्रावर आपले व कुटुंबातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक, विधानसभा मतदार संघाचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व नाव लिहून ते परत मुलांकडे देतील व ते संबंधित तहसिल कार्यालयात जमा करण्यात येतील. संकल्पपत्र भरून घेण्याशिवाय इतर मतदारांनीही अधिकाधिक प्रमाणात मतदान करावे, यासाठीही जनजागृती केली जात आहे. जिल्हाभरातील विविध शाळेतही अशी जागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.स्वीप अंतर्गत उपक्रम : पालकांना घातली जाणार मतदानाची शपथया संकल्प पत्रावर मी मतदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो की, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करीन. तसेच मी कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडीत असा संदेश या संकल्पपत्रात दिलेला आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSocialसामाजिक