शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अडीच लाख मुले करणार मतदारांची जनजागृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:52 IST

मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हातील पाचही विधानसभा मतदार संघात २१ आक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली.दीपाली मोतीयाळे म्हणाल्या, जिल्हास्तरावरावरुन तालुकानिहाय संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आपल्या अधिनस्त शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या मार्फत ते शाळा शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्फत ते मुलांद्वारे ते पालकांपर्यंत पोहचविले जाणार आहेत. त्यानंतर पालक म्हणजेच मतदार त्या संकल्प पत्रावर आपले व कुटुंबातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक, विधानसभा मतदार संघाचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व नाव लिहून ते परत मुलांकडे देतील व ते संबंधित तहसिल कार्यालयात जमा करण्यात येतील. संकल्पपत्र भरून घेण्याशिवाय इतर मतदारांनीही अधिकाधिक प्रमाणात मतदान करावे, यासाठीही जनजागृती केली जात आहे. जिल्हाभरातील विविध शाळेतही अशी जागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.स्वीप अंतर्गत उपक्रम : पालकांना घातली जाणार मतदानाची शपथया संकल्प पत्रावर मी मतदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो की, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करीन. तसेच मी कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडीत असा संदेश या संकल्पपत्रात दिलेला आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSocialसामाजिक